बिग बॉस १६ मध्ये प्रसिद्ध असलेला मैत्रीचा ग्रुप म्हणजेच “मंडळी” आणि बिग बॉस १६ चा फिनाले होऊन बराच वेळ झाला आहे. परंतु बिगबॉस चे काही सदस्य अजूनही बिगबॉस संदर्भामध्ये चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये खरी मैत्री बिग बॉस १६ मध्ये पाहायला मिळाली. शिव ठाकरे (Shiv Thakare), साजिद खान (Sajid Khan), सुंबुल ताैकीर (Sumbul Touqeer Khan), अब्दू रोजिक (Abdu Rojik), एमसी स्टॅन (MC Stan) आणि निम्रत काैर (Nimrit Kaur) यांच्यामध्ये खरी मैत्री बघायला मिळाली. बिग बॉस च्या घरात बिग बॉस नेहमीच दोन मित्रांची असो किंवा मैत्रिणी असो त्यांची परीक्षा घेत असतो त्यामुळे मंडळी या सर्व परीक्षांमध्ये पास झाली आणि त्यांची मैत्री शेवटच्या दिवसापर्यत पाहायला मिळाली. मंडळीला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले.
बिग बॉस १६ मध्ये सर्व स्पर्धक असताना या मैत्रीला अर्चना गौतम हिने यांचे मंडळी हे नाव ठेवले होते. बिग बॉस १६ संपल्यानंतर मंडळींमधील सर्वच सदस्य जोरदार पार्टी करताना दिसले. शिव ठाकरे, साजिद खान आणि अब्दू रोजिक यांनी खास पार्टीचे आयोजन केले होते त्या पार्टीला त्यांनी अनेक सेलिब्रेटीना बोलावले होते. बऱ्याच वेळा मंडळींमधील सदस्य धमाल करतानाचे फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडियावर शेयर करताना दिसत असतात. निम्रत कौर ही सुद्धा मंडळींची सदस्य होती. परंतु ती मंडळींच्या अनेक पार्ट्यांमध्ये निम्रत काैर ही उपस्थित नव्हती आणि ती मंडळी सोबतचे व्हिडीओ आणि फोटो देखील शेयर करत नव्हती. त्यामुळे अनेकदा नेटकऱ्यांनी तिची शाळा घेतली.
ट्रोल करणाऱ्याना निम्रत काैरने चांगलेच सुनावले आहे. निम्रत काैर म्हणाली की, मला नेहमीच मी कोणाला विश केले नाही किंवा पार्टीतील फोटो शेअर केले नाही म्हणून ट्रोल केले जाते. परंतु, हा सर्व बालिशपणा आहे. मला माहिती आहे की, आमची मैत्री काय आहे. माझे बरेच मित्र मैत्रीण आहेत. मी कोणाचेही फोटो शेअर करत नाही. मी एखाद्या ठिकाणी जर उपस्थित नसेल तरीही मी माझ्या मित्रांसोबत नेहमीच असते. त्यावेळी मी ठिक नसेल किंवा बिझी देखील असून शकते ना असे निम्रत काैर म्हणाली.
हे ही वाचा:
IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना
जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक
Gujrat Titans ला मिळवून दिले शुभमन गिल आणि मोहित शर्माने अंतिम फेरीचे तिकीट