Thursday, November 30, 2023

Latest Posts

दिवाळी पाडवा कधी आहे? शुभ मुहूर्त आणि महत्व घ्या जाणून

डेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवाळी पाडवा यंदा १४ नोव्हेंबरला मंगळवारी साजरा केला जाणार आहे. लक्ष्मीपूजन झाले की, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडव्याचा सण साजरा केला जातो.

सध्या सगळीकडे दिवाळीला सुरुवात झाली आहे.त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे.विविध प्रकारचे आकाशकंदील, दिवे, सजावटीच्या वस्तू, पणत्या, फराळाचे पदार्थ आणि नवे कपडे इत्यादी गोष्टींची रेलचेल पहायला मिळतेयं. आपल्या देशात दिवाळीची  सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, ऊर्जेचा आणि प्रकाशाचा सण होयं. यंदाची दिवाळी ९ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून १५ नोव्हेंबरला भाऊबीज झाल्यानंतर, दिवाळी समाप्त होईल.

यंदा दिवाळी पाडवा कधी आहे? पाडव्याचा शुभ मुहूर्त कधी त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) कधी आहे?

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवाळी पाडवा यंदा १४ नोव्हेंबरला मंगळवारी साजरा केला जाणार आहे. लक्ष्मीपूजन झाले की, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडव्याचा सण साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस आपल्याकडे अतिशय शुभ मानला जातो.दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी ६ वाजून १४ मिनिटांनी ते सायंकाळी ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे.

दिवाळी पाडव्याचे महत्व काय?

दिवाळी पाडव्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाचे खास महत्व आहे. या दिवशी सोने खरेदी आवर्जून केली जाते. त्यासोबतच, नवीन वाहनाची देखील खरेदी केली जाते.

पाडव्याला सूवासिनींकडून पतीचे औक्षण केले जाते. औक्षण केल्यावर पती पत्नीला भेटवस्तू देतो. व्यापाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा प्रारंभ देखील पाडव्याच्या दिवसापासून केला जातो. शिवाय, या दिवशी व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्या, पेन इत्यादी अनेक वस्तूंची पूजा करतात.

बलिप्रतिपदा पूजा

दिवाळी पाडव्याच्या दिवशी बलिप्रतिपदेच्या पूजेला ही खास महत्व आहे. बलिप्रतिपदेतील बळी राजाची आजच्या दिवशी खास पूजा केली जाते. हा बळी राजा शेतकऱ्यांचा राजा होता. विष्णूच्या वामन अवताराने या बळी राजाकडून तीन पावले जमीन दान स्वरूपात मागून त्याला मारले होते.

पंरतु, हा बळी राजा उदार होता. तो जनतेची खूप काळजी घ्यायचा. त्यामुळे, आजच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. आज ही भावाला ओवाळताना महिला आवर्जून म्हणतात की, ‘इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’.

हे ही वाचा : 

दिवाळी पार्टीत क्रिती सनॉनचा ग्लॅमरस अंदाज,फोटो व्हायरल

जेह-तैमूरसोबत करिनानं काढली रांगोळी पाहून नेटकरी हैरान,दिवाळी आहे की होळी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss