Maharashtra Guardian Minister List : राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार हा ही विषय संपुष्टात आला तोच कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार हा प्रश्न चर्चेला आला होता. मात्र,आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला आहे. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी समाजमाध्यमावर मोठी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना आता पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून सध्या चर्चेत असणाऱ्या बीडचे पालकत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर राज्यातील नाजूक भाग म्हणजे गडचिरोली, या गडचिरोलीचे पालकत्व देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे तसेच मुंबई शहराचे पालकत्व देण्यात आले आहे. या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक बदल केले असून बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वादात आलेले धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद दिलेले नाही. त्यांचे नाव बीडसाठी चर्चेत होते. परंतु धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मिळाल्यामुळे त्यांनी याबद्दल आता मौन सोडले आहे. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर होताच धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांची एक्स पोस्टवरील पहिली प्रतिक्रिया
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.
बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो.
सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.
तीन जणांना मिळाले दोन जिल्ह्याचे पालकत्व
एकनाथ शिंदे, अजित पवार आणि चंद्रशेखऱ बावनकुळे यांच्याकडे दोन जिल्हे दिले आहेत. एकनाथ शिंदे यांना ठाणे सोबत मुंबईची जबाबदारी दिली आहे. तसेच अजित पवार यांनाही बीड आणि पुणे जिल्हा दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर आणि अमरावती जिल्हा दिला आहे.
- कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस, सहपालकमंत्रीआशिष जयस्वाल
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती- चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
मुंबई शहर- एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सिंधुदुर्ग- नितेश राणे
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
सातारा -शंभुराजे देसाई
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
जळगाव – गुलाबराव पाटील
यवतमाळ – संजय राठोड - कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ
अकोला – आकाश फुंडकर
भंडारा – संजय सावकारे
बुलढाणा – मकरंद जाधव
चंद्रपूर – अशोक ऊईके
धाराशीव – प्रताप सरनाईक
धुळे – जयकुमार रावल
गोंदिया – बाबासाहेब पाटील
हिंगोली – नरहरी झिरवळ
लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
मुंबई शहर – एकनाथ शिंदे - मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा
नांदेड – अतुल सावे
नंदुरबार – माणिकराव कोकाटे
नाशिक – गिरीष महाजन
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – अदिती तटकरे
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
जालना – पंकजा मुंडेहे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .