बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभरात सगळीकडे मोठ्या प्राणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. या हत्याप्रकाणाच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप असणाऱ्या वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला वॉन्टेड म्हणून जाहीर करण्यात आला आहे. काल बीडच्या विशेष न्यायालयात काल वाल्मिक कराडला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असणाऱ्या वाल्मिक कराड सोबत आर्थिक हितसंबंध ठेवल्याचा आरोप मुंडेंवर करण्यात येत आहे. आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मुख्य न्यायमूर्तीं आलोक आराधे यांना पत्र लिहिलं आहे.
काय लिहलं आहे पात्रात?
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील अराजकता आणि दहशतीची स्थिती आहे. या हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था आणखी ढासळली असून तेथील नागरिक दहशतीखाली आहेत. एक जागरूक नागरिक म्हणून ही स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे आपली जबाबदारी आहे. त्यामुळे, नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहण्याच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेची घडी पुन्हा बसवण्यासाठी न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करावा. अशी मागणी दमानिया यांनी मुख्य न्यायमूर्तींकडे केली आहे, आपल्या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर करावे अशी मागणी करताना देशमुख हत्या प्रकरणावर देखरेख ठेवण्याची आणि तपासाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करण्याचे आदेश तपास यंत्रणेला देण्याची मागणीही दमानिया यांनी केली आहे..
धनंजय मुंडेंची चौकशी करण्याची मागणी
धनंजय मुंडे सत्ताधारी पक्षाचे असून यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांची निवडणूक आयोगानेही चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना लोकप्रतिनिधी दूर ठेवणे गरजेचे असल्याची मागणी दमानिया यांनी पत्रात केली आहे.तसेच बीडमधील परिस्थितीची दखल घेऊन तेथील स्थिती सुधारण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करून देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी निष्पक्ष होण्यासाठी खटला मुंबईतील न्यायालयात वर्ग करण्यात यावा. वाल्मिक कराड आणि अन्य आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना मुंबईतील कारागृहात ठेवावे. तसेच, त्यांना व्हिसीमार्फत न्यायालयात हजर करावे. देशमुख हत्येच्या तपासावर न्यायालयाने देखरेख ठेवावी. मुंडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची एसीबीला चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. तर वाल्मिक कराड आणि त्यांचे कुटुंबीयांच्या बेहिशेबी संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) देण्याच्यासारख्या मागण्या दमानिया यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.
हे ही वाचा :