आपल्याला सध्या खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार 1 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची घोषणा करू शकते, ज्यामुळे खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. या घोषणेचे महत्त्व काय आहे? आणि त्याचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो बघुयात या व्हिडिओच्या माध्यमातून.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) पेन्शन योजनेअंतर्गत एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सध्या, EPFO पेन्शनधारकांना 1000 रुपयांची किमान पेन्शन मिळते, जे अनेक वर्षांपासून अपरिवर्तित आहे. मात्र, महागाईच्या वाढत्या दरामुळे या पेन्शन रकमेचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे, EPFO च्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे दरमहा 7,500 रुपयांची किमान पेन्शन देण्याची मागणी केली आहे. ईपीएस 95 नॅशनल मूव्हमेंट कमिटीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर म्हणाले अर्थमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की त्यांच्या मागण्यांवर विचार केला जाईल. राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं की, 7,500 रुपयांची किमान पेन्शन जाहीर केली गेली पाहिजे. यापेक्षा कमी रक्कम निवृत्त कर्मचाऱ्यांना सन्माननीय जीवन जगण्याची संधी देऊ शकणार नाही.
EPS योजना आणि आर्थिक परिस्थिती
सध्याच्या EPS 95 योजनेत, कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराचा 12% भाग भविष्य निर्वाह निधीमध्ये जातो. यातील 8.33% रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेत जाते. पण, यामुळे 1000 रुपयांची किमान पेन्शन मिळत असून, हे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अपुरे आहे. महागाई वाढत असताना, ही रक्कम त्यांच्या जीवनमानासाठी अपर्याप्त ठरते.
पेन्शनमध्ये वाढ का आवश्यक आहे?
आजच्या दिवसात, 1000 रुपयांची पेन्शन निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अपुरी ठरते. महागाई, वाढत्या राहणीमानाचे खर्च, आणि इतर आर्थिक दबाव पाहता, 7,500 रुपयांची पेन्शन निवृत्त कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे.
कर्मचारी प्रतिनिधींच्या मागणीला समर्थन मिळालं आहे, आणि अर्थमंत्री सीतारमण यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिलं आहे की त्यांच्या मागण्यांवर विचार केला जाईल. जर ही वाढ 1 फेब्रुवारी रोजी जाहीर केली गेली, तर लाखो कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल.
7,500 रुपयांपर्यंतच्या पेन्शनमध्ये वाढ झाल्यास, निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे आर्थिक दृषटिकोन अधिक आरामात राखता येईल. हे त्यांच्या जीवनमानात सुधारणा करेल आणि त्यांच्या निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करेल.
अर्थसंकल्पाची ही घोषणा खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा क्षण ठरू शकतो. हे त्यांच्यासाठी एक सकारात्मक बदल असू शकतो, जो त्यांना आर्थिक सुरक्षिततेची ग्वाही देईल.आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा.
हे ही वाचा:
अजितदादा….दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर…काय म्हणाले Rohit Pawar?
Central Railway चा खोळंबा; उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.