Monday, November 13, 2023

Latest Posts

Ahmednagar मध्ये जमिनीच्या वादावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी

राज्यभरात दिवाळीचा उत्साह असताना अहमदनगर जिल्ह्यातून एक अनपेक्षित घटना समोर आली आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे.

राज्यभरात दिवाळीचा उत्साह असताना अहमदनगर जिल्ह्यातून एक अनपेक्षित घटना समोर आली आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या गुहा गावात मोठा तणाव बघायला मिळाला आहे. गुहा गावात पुजेवरुन दोन गटात राडा झालाय. मारहाणीनंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. घटनेची माहिती मिळताच परिसरात पोलीस दाखल झाले आहेत. या गावात वास्तू मंदिर आहे की मशीद? असा वाद कोर्टात प्रलंबित आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर गावात मोठा तणाव निर्माण झालाय. दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. संबंधित घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला आहे.

सोमवती अमावस्येनिमित्त (Somvati Amavasya) भजन सुरू असताना अचानक दोन गटात तुंबळ हाणामारीची (Clash) घटना घडली आहे. भजन म्हणणाऱ्यांना मारहाण करण्यात आली असून संबंधित घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Video Viral) झाला आहे. घटनेनंतर तालुक्यातील गुहा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सोमवती अमावस्येनिमित्त राहुरी तालुक्यातील गुहा गावातील कानिफनाथ मंदिरात (Kanifnath Mandir) भजनाचे आयोजन करण्यात आले होते. हे भजन सुरू असताना अचानक दोन गटात वाद झाला.

अनेक वर्षांपासून राहुरी (Rahuri taluka) तालुक्यातील गुहा गावात कानिफनाथ महारांजाच्या मंदिरात आरती केली जाते. आज सोमवती अमावस्येनिमित्त भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोन गट समोरासमोर आल्यानंतर काही कारणावरून वादाला सुरवात झाली. या वादाचे रूपांतर काही वेळात हाणामारीत झाले. जवळपास वीस ते तीस लोकांचा जमाव एकमेकांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसते आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जमाव दाखल झाला आहे. आता पोलीस पुढची भूमिका काय घेतात हे पाहणे महत्वाचे आहे. या वादाचे पर्यावसान थेट हाणामारीत झाल्याने परिसरात प्रचंड गोंधळ झाला. दोन्ही गट आमनेसामने आल्याने तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण समोर आले. यात भजन भजन म्हणणाऱ्यांना मारहाण करण्यात आली असून जमिनीच्या वादातून हा प्रकार झाल्याचं प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. मात्र या प्रकाराने खळबळ उडाली असून गावात तणावाचे वातावरण आहे.

Latest Posts

Don't Miss