spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

Dhananjay Munde: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा अजित पवारांकडे राजीनामा ; करूणा मुंडेंचा मोठा दावा

वाल्मिक कराड या प्रकरणाचा सूत्रधार असल्याने आता मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची आता चर्चा रंगली आहे. अशातच करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट माध्यमातून सूचक वक्तव्य केलं आहे. करुणा मुंडे यांनी एक सूचक पोस्ट केलेली आहे, त्यात त्यांनी म्हटंल आहे, ३ मार्च २०२५ रोजी राजीनामा होणार आहे.

Karuna Munde on Dhananjay Munde: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे. यामुळे धनंजय मुंडें यांच्या अडचणीत वाढ होऊन उद्या राजीनामा होणार आहे, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. वाल्मिक कराड या प्रकरणाचा सूत्रधार असल्याने आता मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची आता चर्चा रंगली आहे. अशातच करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट माध्यमातून सूचक वक्तव्य केलं आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वाचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, वाल्मीक कराड हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खंडणीच्या वादातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा उल्लेख या आरोपपत्रात आहे. तसेच, या प्रकरणात खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा समावेश करण्यात आला आहे. पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांमध्ये पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे, तसेच हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील सीआयडीच्या हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान वाल्मिक कराड या प्रकरणाचा सूत्रधार असल्याने आता मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची आता चर्चा रंगली आहे. अशातच करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट माध्यमातून सूचक वक्तव्य केलं आहे. करुणा मुंडे यांनी एक सूचक पोस्ट केलेली आहे, त्यात त्यांनी म्हटंल आहे, ३ मार्च २०२५ रोजी राजीनामा होणार आहे.

करूणा शर्मा माध्यमांशी बोलताना, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दलची मोठा खुलासा केला आहे. मला १०० टक्के याबद्दलची माहिती मिळालेली आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवस आधीच घेतला गेला आहे. वाल्मिक कराड जर दोषी असेल तर मी स्वत: राजीनामा देईन, असे सांगितले होते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर काहीही राहिलेले नाही. त्यामुळे उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होईल, असे करुणा शर्मा म्हणाल्या. धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवारांनी घेतला आहे. ते अजून जाहीर का झालेले नाही, याबद्दलची माहिती नाही. पण काल एसआयटी, सीआयडी चौकशीचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे १०० टक्के उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होणार आहे, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा थेट हात असेल असं मला वाटत नाही,आज मी २७ वर्षे त्यांच्यासोबत राहिली आहे. ते अशा वृत्तीचे नाहीत. धनंजय मुंडे माझे पती आहेत. ते अशा वृत्तीचे नाहीत. पण, वाल्मीक कराडने त्यांच्या पावरचा सत्तेचा वेळोवेळी, २०१४ पासून कराड त्यांच्या सत्तेचा गैरवापर करत आहे. यामध्ये धनंजय मुंडेंचा काही हात असेल असं मला वाटत नाही, असेही करूणा मुंडे यांनी म्हटलं आहे.

करुणा शर्मा यांनी पोस्ट केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये उद्या म्हणजेच तीन मार्च रोजी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार असे म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काल पोलिसांच्या आरोप पत्रात वाल्मीक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्यावरील राजीनामाची मागणी आणि दबाव वाढत आहे. अशातच करुणा मुंडे यांची पोस्ट चर्चेत आली आहे. तीन मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही पोस्ट केली आहे का असा सुद्धा सवाल उपस्थित होत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याची मागणी वाढत आहे. सत्ताधारी पक्ष असो, विरोधक असो किंवा सामाजिक संघटना असो यांच्याकडून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. त्यानंतर आता स्वतः करुणा मुंडे यांनी केलेली पोस्ट यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

ज्यावेळी वाल्मीक कराड सरेंडर झाला होता, त्यावेळी त्यांनी देखील सांगितलं होतं. जो कोणी दोषी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. संतोष देशमुख यांची इतकी निर्घृण हत्या केली गेली, अशी हत्या महाराष्ट्रात आतापर्यंत कधी झाली नाही, त्यासाठी मी मागणी करते, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असेही करूणा मुंडे यांनी पुढे म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्यासाठी मोठ्या उशीर झाला आहे. ज्या दिवशी वाल्मीक कराड सरेंडर झाला होता, त्याच दिवशी त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. नैतिकतेच्या भावनेतून त्यांनी तेव्हाच राजीनामा देणं गरजेचं होतं. अजित पवारांनी सुद्धा म्हटलं होतं, नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे नैतिकता नसेल त्यामुळे राजीनामा देण्यासाठी उशीर झालेला आहे पुढे करूणा मुंडे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

Mumbai Megablock: पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर आजपासून २ दिवसीय मेगाब्लॉक

Ration Card E-KYC: रेशन कार्ड ला E-KYC केली नाही तर, तर अन्नधान्य मिळणार नाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss