बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेला आहे. दररोज नव नवीन माहिती पुढे येताना दिसत आहे. या हत्याप्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून करण्यात येत आहे. अशातच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात आता आणखी एक नवी माहिती पुढे आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी एक दिवस आधी घटनेतील आरोपींनी बीड-अंबाजोगाई महामार्गावरील तिरंगा हॉटेलवर जेवण केल्याचं तपासात समोर आले आहे.
तिरंगा हॉटेलवर एसआयटीच्या टीम दाखल
सरपंच देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर रोजी झाली. हत्येच्या आदल्या दिवशी आठ डिसेंबर रोजी घटनेतील आरोपींनी याच तिरंगा हॉटेलवर जेवण केले होते. त्यानंतर आरोपी केजच्या दिशेने रवाना झाले. या प्रकरणात तपास यंत्रणेकडून प्रत्येक गोष्टीची तपासणी आणि चौकशी सुरू आहे. आरोपींची हत्येच्या आद्ल्यादिवशीची तिरंगा हॉटेलवर जेवण केल्याचं माहिती मिळताच सीआयडी आणि एसआयटीच्या टीमने तिरंगा हॉटेल गाठलं. तपास यंत्रणेने हॉटेल मालकाची चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे. तपास यंत्रणेला योग्य ते सहकार्य केल्याचे हॉटेल मालका बाबुराव शेळके यांनी सांगितले आहे.
20 तारखेला होणार जामिन करण्याची पुढची सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये केज जिल्हा सत्र न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर कराडच्या वकिलाने कोर्टामध्ये लगेच जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाला सीआयडीकडून कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले होते. तर या जामीन अर्जावर केज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असून वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर येत्या 20 तारखेला सुनावणी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयाकडे 22 तारखेला पुढील सुनावणी व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयानं सुनावणीसाठी 20 तारीख दिली आहे.
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती