सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार उत्तम जानकर भाजपचे खासदार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी बोलतानां अनेक वक्तव्य केले आहेत. भाजप वर निशाणा साधताना निवडणूक आयोग ऑफिसमध्ये बसून ईव्हीएम हॅक होत नसल्याचे सांगत आहे. मात्र तीच मशीन दहा मिनिट माझ्याकडे द्या, काय तंत्रज्ञान आहे, तुम्ही काय घोटाळे केलेत, कशी मते चोरलीत, हे मी पुराव्यानिशी सांगतो” असा दावा आमदार उत्तमराव जानकर यांनी केला आहे. देशासाठी “स्वायत्त संस्था ज्या पद्धतीने काम करत ते घातक आहे. सरकार ज्या पद्धतीने या संस्थांचा वापर करत आहे, हे देखील महाभयंकर घातक आहे” असं उत्तमराव जानकर म्हणाले. निवडणूक आयोग हा भाजपसाठी “वाल्या ” म्हणूनच काम करत असल्याचा गंभीर आरोप उत्तमराव जानकर यांनी केला आहे. यांसारखे अनेक विधान उत्तमराव जानकर यांनी केली आहेत.
उत्तम जाणकार यांनी भाजप सरकार व निवडणूक आयोगावर निशाणा साधत “कोणत्याही परिस्थितीत ज्यांनी कोणी शरद पवारांपेक्षा अजित पवार मोठा व उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे मोठा हे चित्र तयार केले ते वाचणार नाहीत. जरी तुमच्या हातात आज सत्ता असली तरी कुठेतरी कृष्ण जन्माला येतोच” असे म्हणत त्यांनी सरकार आणि निवडणूक आयोगाला इशारा दिला. लवकरच राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार जाणार असल्याचा पुनरुच्चार उत्तमराव जानकर यांनी केला.
तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना, धनंजय मुंडे म्हणजे “पुरुष वेश्या ” असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता. गृहखात जागं असंत, शुद्धीवर असतं तर असा वाल्या कोळी तयारच झाला नसता म्हणत गृहमंत्री आणि सरकारच्या वरद हस्तामुळेच राज्यात गुंडगिरी सुरू आहे” असा आरोप जानकर यांनी केला. “सरकार आणि वाल्मिक कराडमध्ये तडजोडी झाल्यामुळेच तो पोलिसांना शरण गेला. त्यामुळे घरच्यापेक्षा चांगली सोय त्याला पोलीस स्टेशनमध्ये मिळत आहे” असा आरोप उत्तमराव जानकर यांनी केला.असे बरेच घणाघाती आरोप, वादग्रस्त वक्तव्य उत्तमराव जानकर यांनी सरकार, निवडणूक आयोग, धनंजय मुंडे यांच्यावर केले आहेत.
हे ही वाचा:
MNS बद्दल विचारताच आदित्य ठाकरेंनी साधला राज ठाकरेंवर निशाणा !, म्हणाले,…
मालाडमध्ये चोराचा अनोखा कारनामा!, मौल्यवान वस्तू मिळाल्या नाही म्हणून घेतला महिलेचा…