spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

लाथ मारून चुकी केली, पंचांना थेट गोळ्या घातल्या पाहिजे: डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर येथे पार पडली. ही स्पर्धा मोठ्या वादामुळे चर्चेत आहे. गादी विभागातील उपांत्य अंतिम लढत नांदेडच्या शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. ही लढत अटीतटीची झाली. तेव्हा मोहोळच्या एका डावात राक्षे पाठीवर आला अन पंचानी रक्षेला थेट बाद घोषित केले. त्यामुळे ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. मात्र शिवराज राक्षेने पंचाच्या निर्णयाला विरोध केला. पण पंचाने शिवराज रक्षेच्या मागणीला दुर्लक्ष केला आणि पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केला आणि वाद पेटला. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने सामना संपल्यानंतर थेट पंचांची कॉलर धरली आणि त्यानंतर थेट लाथ मारली. यावर आता आजी-माजी कुस्तीपटू आणि पंचांकडून प्रतिक्रिया समोर येत आहे.

 

डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी या घटनेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शिवराज राक्षेने लाथ घातली ही चूक झाली. पण जो कालच्या सामन्यात पंच होता, असल्या पंचाना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले.

महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले की, पृथ्वीराज मोहोळचे मी अभिनंदन करतो, त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही. मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे. त्यावेळी शिवराज राक्षेने लाथ मारून चूक केली, खरं तर त्याने पंचाना गोळ्या घालायला पाहिजे होत्या. मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो, त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो.

शिवराज पराभूत झाल्याचे सिद्ध झाल्यास एक कोटी देऊ

एवढेच नाही तर शिवराज राक्षेचा पराभव आंतरराष्ट्रीय संस्थांनी जर मान्य केला तर एक कोटीचे बक्षीस देईल असं शिवराजचे प्रशिक्षक रणधीर पोंगल यांनी जाहीर केल आहे. तसेच काका पवार तालमीला बदनाम करण्याचे षडयंत्र काही लोक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर शिवराज राक्षे यांचे भाऊ युवराज राक्षे यांनी शिवराज राक्षेच्या अनेक कुस्त्यांचे दाखले देत शिवराजच्या खेळ आणि स्वभाव सांगत पंचांनी दिलेला चुकीचा निर्णय आहे असं म्हंटल आहे. सोबतच शिवराजला पंचांकडून शिवीगाळी झाल्यामुळेच त्यावर पंचाला लाथ मारण्याची वेळ आली असं म्हटलं आहे.

हे ही वाचा :

CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा 

Latest Posts

Don't Miss