देश उभारणीमध्ये शिक्षण व शिक्षकांचे स्थान महत्वपूर्ण आहे देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी मुबलक कुशल संस्कृतिक मनुष्यबळ तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. शिक्षकांना आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा देण्यात आली आहे. शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी स्वातंत्र्य यंत्रणा तयार करण्यात आले असून जिल्हा पातळीवरील समस्या सोडविण्यात शिक्षणाधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. जालना जिल्ह्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत दोन महिन्यापासून आठ ते दहा शाळांची वेतन प्रलंबित आहे.
आर्थिक नियोजन कोलमडल्याने त्या शाळावर कार्यरत शिक्षक कर्मचारी परीशान आहेत. मानसिक नियमित वेतनही कमालीची अनिरुद्ध आहे. नियमबाह्य वैयक्तिक मान्यतेवरील व इतर प्रलंबित प्रकरणाबाबत पदाधिकारी रीतसर निवेदन घेऊन गेला असता शिक्षणाधिकारी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे एकूण घेऊन त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न समस्या सोडवण्याऐवजी संघटना पदधिकाऱ्यांच्या अपमानित करतात. आता तर त्यांची मजल संघटना पदाधिकाऱ्यांवर पोलिसाकडे खोटी तक्रार करण्यापर्यंत गेली आहे. कार्यालयीन वेळेत शिक्षणाधिकारी माध्यमिक व त्यांचे कर्मचारी क्वचितच करण्यात असतात.
मात्र, सायंकाळी सहानंतर कार्यालय सुरू होते आर्थिक सौदेबाजी करणाऱ्यांची कामे कार्यालयीन वेळेनंतर मार्गी लागतात. त्यामुळेच नियमानुसार कामे करण्याचा आग्रह धरणाऱ्या मराठवाडा शिक्षक संघ पदाधिकाऱ्यांची शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना अडचण होत असून संघटना पदाधिकाऱ्यांना अपमानित करून उलट त्यांच्यावरच कुठे गुन्हे दाखल केले जात आहे. शिक्षकांची आढळून करणाऱ्या शिक्षणाधिकारी जालना यांच्याबद्दल शिक्षकांच्या मनात घोष आहे व नाराजी निर्माण झाले आहे. त्याची दखल घेऊन शिक्षकांचे आर्थिक मानसिक शोषण करून प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या मंगरूळ शिक्षणाधिकारी माध्यमिक जालना यांना हटवण्यासाठी एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आल्याची सांगितले आहे.
हे ही वाचा:
‘नौलखा हार’ गाण्याच्या दिग्दर्शनावेळी आयुष संजीवला गंभीर दुखापत, तरीही काम पूर्ण करत जिंकली मनं
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश