spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Mumbai Taxi Fare: प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री; Bus, Auto आणि Taxi चे भाडे वाढणार?

Mumbai Taxi Fare:  मुंबईतील टॅक्सी (Taxi)आणि ऑटो रिक्षा युनियन (Auto Rickshaw Union) कडून भाडेवाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाढलेला खर्च आणि खटुआ समिती (Khatua Committee) च्या शिफारशींचा दाखला त्यांच्याकडून देण्यात आला आहे. सद्यस्थितीत एक किलोमीटरसाठी टॅक्सीचे भाडे 28 रुपये तर रिक्षाचे भाडे 23 रुपये इतके आहे. युनियनच्या नेत्यांच्या मते, या दरांमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. आता सगळीकडे ओला-उबरसारख्या कॅबची (Ola-Uber Cab) सेवा अस्तित्वात असल्यामुळे टॅक्सीने प्रवास करणे कमी झाले आहे. त्यात याआधी मुंबईमध्ये टॅक्सी युनियनच्या (Mumbai Taxi Mens Union) नेत्यांकडून यंत्रणांना टॅक्सीच्या भाड्यामध्ये चार रुपयांची वाढ करण्याची विनंती केली होती. ही  मागणी मान्य झाली तर, एका किलोमीटरसाठी किमान 32 रुपये आकारण्यात येतील. जर रिक्षा आणि टॅक्सी संघटनांची (Mumbai Taxi Mens Union) मागणी मान्य झाली तर रिक्षाचे भाडे तीन रुपयांनी वाढून ते 26 रुपये इतके होईल तर टॅक्सीचे भाडे 28 रुपयांवरून 32 रुपये इतके होईल. याआधी ऑक्टोबर (October) 2022 मध्ये भाडेवाढीबद्दल निर्णय घेण्यात आला होता.

टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनेप्रमाणेच (Mumbai Taxi Mens Union) आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून (Maharashtra State Road Transport Corporation) भाडेवाडीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. एकीकडे रिक्षा-टॅक्सीच्या युनियनकडून (Taxi Unions in Mumbai) भाडेवाढीची मागणी करण्यात आली आहे तर दुसरीकडे परिवहन सेवेकडूनसुद्धा भाडेवाढीसाठी मागणी करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना प्रवासासाठी अधिकचा खर्च करावा लागू शकतो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (Maharashtra State Road Transport Corporation) साधारणपणे 14 ते 18 टक्क्यांनी इतके भाडेवाडीचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव जर मान्य झाला तर एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासासाठी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. एकीकडे वाढती महागाई तर दुसरीकडे ऑटोरिक्षा (Auto Rickshaw) आणि टॅक्सी युनियनकडून (Taxi Union) व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी भाडेवाढीची मागणी यामुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

मागील ५ वर्षात Best अपघातात किती नागरिक मृत्युमुखी? किती कर्मचारी निलंबित?

गृहमंत्री अमित शहांविषयीचे पवारांचे वक्तव्य राजकीय विद्वेषातूनच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss