spot_img
Friday, March 21, 2025

Latest Posts

Raksha Khadse: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार

जळगावातील भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मुलीची छेड काढण्यात आली आहे. काही टवाळखोर पोरांनी ही छेड काढण्यात आली आहे. संबंधित मुलांना अडविण्याचा प्रयत्न मुलीच्या सुरक्षारक्षकांनी केला असता संबंधित टवाळखोरांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. यावरून राज्यातली कायदा सुव्यवस्थेवर कितपत विश्वास ठेवावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Jalgaon: पुण्यातील स्वारगेट येथील तरुणीच्या अत्याचाराचा मुद्दा चर्चेत असतानाच जळगावातील भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मुलीची छेड काढण्यात आली आहे. काही टवाळखोर पोरांनी ही छेड काढण्यात आली आहे. संबंधित मुलांना अडविण्याचा प्रयत्न मुलीच्या सुरक्षारक्षकांनी केला असता संबंधित टवाळखोरांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. यावरून राज्यातली कायदा सुव्यवस्थेवर कितपत विश्वास ठेवावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रक्षा खडसे यांची मुलगी यात्रा महोत्सवात तिच्या मैत्रिणींसह गेली होती. यावेळी काही टवाळखोरांनी त्यांची छेड काढली. सुरक्षारक्षकांनी टवाळखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु टवाळखोर त्यांच्यासमोर बधले नाहीत. त्यांनी शेरेबाजी करणे सुरुच ठेवले. तसेच मुलींना धक्काबुक्कीही झाली. या तरुणांना तातडीने पोलिसांनी अटक करण्याची मागणी रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी केली आहे. रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसात चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस चौकशी सुरू आहे. अद्याप गुन्हा घडूनही संबंधित आरोपींवर कोणताही कारवाई झालेली नाहीये. त्यामुळेच खुद्द रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जावे लागले. त्यांनी घटनेच्या तपासावरून पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे समजते. माझं एकच म्हणणे आहे की, इतक्या सुरक्षेतही जर अशा पद्धतीने छेडछाड केली जाते तर सर्वसामान्य मुलींचा काय होणार? असा सवालही त्यांनी पोलिसांना विचारला. दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जात असेल राज्यात तर सर्वसामान्यांच्या मुलींबाबत सरकारचं नेमकं धोरण काय आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण, बदलापूर बलात्कार तसेच पुणे बलात्कार प्रकरणांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती बरी नसल्याचे दाखवून दिले आहे. दरदिवशी कुठे ना कुठे गंभीर गुन्ह्यांची नोंद होत आहे. आता भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलीचीच टवाळखोरांनी छेड काढल्याने, सामान्यजण सुरक्षित नाहीतच पण आता नेत्यांच्या मुलीही सुरक्षित नसल्याचेच दिसून येते.

हे ही वाचा:

Mumbai Megablock: पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर आजपासून २ दिवसीय मेगाब्लॉक

Ration Card E-KYC: रेशन कार्ड ला E-KYC केली नाही तर, तर अन्नधान्य मिळणार नाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss