Uday Samant: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरु असलेले वाद ते उघडपणे दाखवत नसले तरी देखील त्यांच्या राजकीय घडामोडींमुळे ते सर्वांसमोर उघडपणे दिसत आहेत. राज्यात एकीकडे राजन साळवी उद्धव सेनेला राम राम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर ऑपरेशन टायगरची (Operation Tiger) मोठी चर्चा झाली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉर रूमच्या धरतीवर कोऑर्डिनेशन रूमची स्थापना झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या पुरस्कार सोहळ्याला शरद पवारांची उपस्थिती अशा तीनही घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा शिवसेनेभोवती आला आहे. स्नेहभोजनाला ठाकरे गटातील आमदार, खासदारांच्या उपस्थितीमुळे शिवसेनेतील नेत्यांचं नाराजी नाट्य सुरू असल्याचा समोर आलं. यावरून ‘काल जेवणावरून वाद झाले आहेत. ऑपरेशन टायगर नाव आम्ही दिले नाही. जशी मुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे तशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक कॉर्डिनेशन रूम आहे. त्यामुळे स्पर्धा असण्यासारखे काही नाही. असे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.
परभणी येथे आयोजित संजीवनी कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला येथे उदय सामंत उपस्तिथ होते. यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. परभणी येथे यापूर्वी घेण्यात आलेली कृषी संमेलने चांगली झाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नसल्याचेही ते म्हणाले. काल स्नेहभोजनावरून झालेल्या वादावर उदय सामंत म्हणाले, काल जेवणावरून वाद झाले आहेत. टायगर ऑपरेशन नाव आम्ही दिले नाही. ऑपरेशनची काहीच गरज नाही. खरी शिवसेना ही शिंदे यांचीच आहे. आता त्या शिवसेनेतील लोकांनाही ते कळले आहे. त्यामुळे आता लोक सोबत येतील. विधान परिषद महामंडळ कोणाला द्यायचे हे सगळे अधिकार शिंदे यांना आहेत. संजय जाधव यांच्या चिडण्यावर मी उत्तर देणार नाही. त्यांच्या ऑपरेशनमध्ये आहेत असे आम्ही म्हटलेले नाही. असं उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात को-ऑर्डिनेशन रुमच्या निमित्ताने वादाचा दुसरा अंक सुरु झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका एकनाथ शिंदे वगळत असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलावलेल्या बहुतांश विभागाच्या बैठकांना त्यांनी दांडी मारली आहे. फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या अगदी स्वत:च्या विभागाच्या बैठकांना देखील शिंदे हजर राहिले नव्हते. फडणवीस यांनी बोलावलेली १०० दिवसांची आढावा बैठक असो किंवा अलीकडे आयोजित करण्यात आलेली महापालिकांसंदर्भातील बैठक असो, एकनाथ शिंदे कोणत्याही बैठकांना हजर नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यात आता कोऑर्डिनेशन रूम मुळे त्यावर आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्याच प्रमाणे ऑपरेशन टायगर हे नाव आम्ही दिले नाही. आम्हाला ऑपरेशनची काहीच गरज नाही. खरी शिवसेना ही शिंदे यांचीच आहे. असेही उदय सामंत म्हणाले.
हे ही वाचा:
Eknath Shinde : राजकारणात मन मोठं असावं लागतं, म्हणत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर वार
Eknath Shinde : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात शह – काटशह सुरु