spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Vinod Tawade यांचा शरद पवारांवर पलटवार म्हणाले दाऊद…

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस Vinod Tawade  यांनी काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जहरी टीका केली. शिर्डीतील भाजप अधिवेशनात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. १९७८ मध्ये Sharad Pawar यांनी बंडखोरी करुन विश्वासघात करण्याचे जे राजकारण केलं, त्यामुले त्यांना आता महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवण्याचं काम केलं, असं अमित शाह शिर्डीतील अधिवेशनात बोलले होते. त्या टीकेला शरद पवार यांनी काल उत्तर दिलं. तर यांच्या या पत्रकार परिषदेवर विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर केले आहे. महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी इतिहासाची पान पलटताना जुन्या गोष्टी बाहेर काढल्या. त्यांनी अमित शाह यांच्यावर व्यक्तीगत स्वरुपाचा हल्लाबोल केला. त्यांनी अमित शाहंचा तडीपारच्या वेळचा सर्व इतिहास बाहेर काढला. हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, तेव्हा त्याला मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं अशी विनंती Amit Shah  यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे चांगल्या पद्धतीत सांगू शकतील. असं शरद पवार म्हणाले.

यावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटरमध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहा यांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती ! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा मा. पवार साहेब विसरले आहेत, असं चोख प्रत्युत्तर विनोद तावडे यांनी शरद पवार यांना दिले आहे.

तर स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांना दोन वेळा जन्मठेपांची म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. ते जर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? श्रद्धेय अटल जी, अडवाणी जी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते, ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयी देखील पवार साहेबांचे हेच मत आहे का? याचे उत्तर पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

Latest Posts

Don't Miss