Friday, April 19, 2024

Latest Posts

मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बच्चू कडूंची आगळीवेगळी प्रतिक्रिया

राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पक्षामध्ये लोकसभा निवडणुकीचे दौरे सुद्धा ठरवले जात आहेत. सध्या पक्षामध्ये आढावा बैठका सुद्धा घेण्यात येत आहेत.

राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पक्षामध्ये लोकसभा निवडणुकीचे दौरे सुद्धा ठरवले जात आहेत. सध्या पक्षामध्ये आढावा बैठका सुद्धा घेण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा ठरल्यापासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा जोरदारपणे रंगू लागल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यापासूनही मंत्रिमंडळाच्या चर्चा सुरु व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप अशी युती असली तरी आता मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी निवडणुकांवरून दोन्ही पक्षामध्ये नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर त्यावरूनच आता प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळावर एक मिश्किल टिप्पणी केली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या त्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

आमदार बच्चू कडू दिव्यांग मंत्रालयासाठी पूर्वीपासून ते आग्रही आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर दिव्यांग मंत्रिमंडळावरून त्यांना छेडले असता त्यांनी राज्यातील शिवसेना-भाजप सरकारविषयी मिश्किलपणे मत व्यत केले आहे. राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलताना त्यांनी सासू आणि सुनेचं उदाहरण देत वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, कारल्याले कारले येऊ दे ग सूनबाई, मग जाय आपल्या माहेरा; पण कारल्याला काही कारलं येत नाही आणि सुनबाई काही माहेरी जात नाही अशीच एकंदरीत व्यवस्था असल्याचा खोचक टोला त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर लगावला आहे.आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून पत्रकारांवरही त्यांनी जोरदार टोला लगावला आहे.

विस्ताराबाबत बोलताना म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा होईल, तुम्ही कशाला एवढं मनावर घेता असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला आहे.यावेळी पत्रकारांना सल्ला देताना म्हणाले की, आता तुम्हीही विस्ताराच्या बातम्या दाखवणे बंद करा कारण जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा दिवसभर बातम्या दाखवत जा असंही त्यांनी मिश्किलपणे आपले मत व्यक्त केले. या सासू सुनेचं आगळ्या वेगळ्या वक्तव्यामुळे राजकारणात नवीन काही तरी घडेल असे वाटत आहे. आणि या बच्चूकडू यांच्या वक्तव्यावर राजकारण्यांकडून हेवेदावे होणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे आता यावर कोण ती प्रतिक्रिया दिली जाणार या कडे लक्ष लागून पाहिले आहे.

हे ही वाचा : 

श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली मतदारसंघावरून दिली प्रतिक्रिया

औरंगजेबाचं नाव घेणाऱ्यांवर फडणवीस भडकले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss