Delhi Election 2025: आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीच्या साडेतीन तासांनी हाती आलेल्या कलांनुसार भाजप ४२, आप २८ आणि काँग्रेस पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे.
प्राथमिक कलानुसार, दिल्लीतील ७० जागांपैकी तब्बल 40 जागांवर भाजप आणि आम आदमी पक्ष (AAP) ३० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस पक्षाला अद्याप खाते उघडता आलेले नाही. मोतमोजणीचे हे कल कायम राहिल्यास भाजप (BJP) तब्बल 27 वर्षांनी दिल्लीत पुन्हा सत्ता हस्तगत करेल. तसे घडल्यास हे भाजपसाठी मोठे यश ठरेल. गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ने एकहाती सत्ता स्थापन केलं. होती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘आप’च्या दिल्लीतील मक्तेदारीला शह दिल्याचे दिसत आहे.
यामागील प्रमुख ५ कारणे
१. भाजपने दिल्लीत गेल्या महिनाभरात प्रचंड आक्रमक प्रचार केला. आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा असलेल्या अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांना भाजपने थेट लक्ष्य केले. या दोन्ही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यामुळे दोन्ही नेत्यांवर तुरुंगावारीची वेळ आली. या सगळ्यामुळे इतके दिवस स्वच्छ प्रतिमा असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या कारकीर्दीला कलंक लागला होता.
२.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बुथ स्तरावर जाऊन केलेले मायक्रो प्लॅनिंगही तितकेच परिमाणकारक ठरले.
३. भाजपकडून प्रत्येक मतदारसंघात सूक्ष्म नियोजन करण्यात आले. उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचारापर्यंत प्रत्येक टप्प्यावर भाजपने अनेक गोष्टींचा बारकाईने विचार केला होता. याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्तेही भाजपच्या मदतीला प्रचाराच्या रिंगणात उतरले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीत घरोघरी जाऊन प्रचार केला आणि आपला संदेश मतदारांपर्यंत पोहोचवला. याचा भाजपला मोठा फायदा झाला. संघाच्या मदतीमुळे भाजपचा पारंपरिक मतदार मतदानाच्या दिवशी बाहेर पडला. याशिवाय, दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची न होऊ शकलेली युतीही भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे.
३. भाजपने यंदाच्या निवडणुकीत यमुना नदीचं प्रदूषण आणि कचऱ्याची समस्या प्रभावीपणे मांडली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी केजरीवालांच्या शिशमहालाचे नरेटिव्ह आक्रमकपणे मांडले होते. स्वत: मोदींनी टीका केल्यामुळे भाजपने नेतेही आक्रमक झाले होते. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीत शिशमहाल हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता.
४. अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केलेल्या लोकप्रिय घोषणांचा प्रमुख वाटा राहिला होता. केजरीवाल यांनी गरिबांना मोफत वीज, पाणी, आर्थिक अनुदान आणि आरोग्य सुविधा देऊ केल्या होत्या. या योजनांमुळे ‘आप’ला प्रत्येक निवडणुकीत मोठे यश मिळाले होते. पंतप्रधान मोदी आणि भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या या राजकारणाला ‘रेवडी पॉलिटिक्स’ म्हणून हिणवले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपकडूनही सामान्य मतदारांना अनेक भुलवणारी आश्वासने देण्यात आली होती.
५. काही दिवसांपूर्वीच एनडीए सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात आला होता. यामध्ये 12 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले होते. हा सामान्य नोकरदारांसाठी मोठा दिलासा मानला जातो. त्यामुळे दिल्लीतील सामान्य नोकरदार आणि मध्यमवर्गाने भाजपच्या पारड्यात भरभरुन मते टाकल्याचे दिसत आहे.
हे ही वाचा :
Follow Us