महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया २० नोव्हेंबर रोजी पार पडली असून उद्या २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अश्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच सीएम पदासाठी लॉबिंग सुरु झाली आहे. पुणे आणि पर्वती विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. या बॅनर मार्फत उपमुख्यमंत्री अजित पवारांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सर्वाना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर निकालाची प्रतीक्षा आहे. या निकाला आधीच राज्यात पोस्टरबाजी सुरु झाली आहे.
अजित पवार यांचे बारामतीमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहेत. या वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या पोस्टरमध्ये सलग आठव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल अजित पवारांच अभिनंदन असा मजकूर पोस्टरमध्ये आहे. तसेच या पोस्टरची चर्चा महायुतीमध्ये सुरु झाली आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी निकाल येण्याआधीच लॉबिंग सुरु केलं. बारामती आणि पार्वती क्षेत्रामध्ये प्रशांत शरद बारवकर मित्र परिवाराने हे बॅनर लावले आहेत. यात निवडणुकीच्या मत मोजणी आधीच मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्याबद्दल अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या रस्त्यावर लागलेल्या या पोस्टरची राजकीय चर्चा सुरु झाली आहे.
महाराष्ट्रात अजित पवार यांनी चारवेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. त्यांना आजून मुख्यमंत्री बनता आलेलं नाही. अजित पवारांनी अनेकदा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काका शरद पवार यांची साथ सोडून ते सरकारमध्ये भाजपासोबत सहभागी झाले. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मविआचा किती जागा जिंकण्याचा दावा?
उद्या २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. उद्या संध्यकाळपर्यंत महाराष्ट्रत कोणाचं सरकार बनणार ते क्लियर होईल. चारवेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार मुख्यमंत्री होतात का? या गोष्टीकडे लक्ष असेल. बहुताश एग्झिट पोल्सनी एनडीएच्या नेतृत्वाखाली महायुती आघाडीच्या सरकारला बहुमत मिळेल असं म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडी १४५ ते १५५ जागा जिंकून सरकार बनवण्याचा दावा करत आहे.
अजित पवार गट आणि शरद पवार गट किती जागांवर आमने- सामने?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक १४९ जागांवर उमेदवार भाजप यांनी केले होते. ८१ जागा शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ५९ जागा लढवल्या. काँग्रेसने १०१, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ९५ तर शरद पवार गटाने ८६ जागा लढवल्या. या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट ५० जागांवर तर शरद पवार गट आणि अजित पवार गट ३७ जागांवर आमने सामने आहे.
हे ही वाचा:
काँग्रेच्या नाना पटोलेंच्या मनात भीती….
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान