Friday, April 19, 2024

Latest Posts

शरद पवार live : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिले अरविंद केजरीवाल यांना समर्थन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai Visit) आहेत. अरविंद केजरीवाल आज (23 मे) संध्याकाळी सात वाजेपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai Visit) आहेत. अरविंद केजरीवाल आज (23 मे) संध्याकाळी सात वाजेपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, खासदार संजय सिंह आणि खासदार राघव चढ्ढा देखील मुंबईत दाखल होणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांची आज भेट घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल संध्याकाळी मुंबईत दाखल होतील. मुंबई भेटीत अरविंद केजरीवाल यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. तर २५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या सोबत पंजाबचे CM भगवंत सिंगमान हे देखील उपस्थित होते. तसेच अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड यांची सुद्धा उपस्तिती दिसून आली.

देशाच्या राजकीय परिस्थिती संदर्भात शरद पवार यांच्या मध्ये चर्चा झाली. राज्य सभेमध्ये बहुमत स्थापन करून नवीन सरकार बांधणी करता येईल याची तयारी आत्तापासूनच तयारी दाखवावी.दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांनी, प्रसारमाध्यमांसमोर चर्चा करताना दिल्लीमध्ये आमच्यावर खूप मोठया प्रमाणात अत्याचार झाले आहे. २०१५ मध्ये जेव्हा आमची सरकार तयार झाली तेव्हा केंद्र सरकार कडून दिल्ली सरकारच्या सगळ्या पॉवर काढून घेतल्या होत्या आणि त्यामुळे आम्हाला कोर्टकचेर्यांना सामोरे जावे लागले. ८ वर्षांपासून आम्ही सर्वोच्च नयायलायाच्या पायऱ्या चढउतार करत होती. आता सर्वोच्च न्यायालय कडून थेट दिल्ली सरकारला आदेश देण्यात आले की , दिल्लीच्या सरकारला पूर्ण अधिकार देण्यात आले. दिल्ली मध्ये ज्या सरकार येईल त्या सरकारला पूर्ण अधिकार असेल. आणि त्यानंतर ८ दिवसात पुन्हा अधिकार काढण्यात आले. आणि म्हणून आम्ही समर्थनाखातर प्रत्येक पक्षाच्या भेटीगाठी घेत जेव्हा या याचिका येईल तेव्हा हि याचिका फेटाळून द्यावी. आणि त्यामुळे जर बहुमत नसेल तर हि याचीका फेटाळली जाऊ शकते. भाजप सरकार हे वागणुकीच्या आधारे पक्ष फोडता. रिन्द केजरीवाल यांनी ३ महत्वाच्या गोष्टी स्पष्ठ केल्या. पक्षामध्ये पैसे देऊन फोडाफोडीचे राजकारण करतात, ED आणि CBI च्या कचेऱ्या मागे लावतात आणि त्यांच्यावर अध्यादेश आणून गव्हर्नरच्या माध्यमातून त्यांचे काम बंद करतात. त्यामुळे हे देशाला खूप हानिकारक आहे. केंद्र सरकारकडून हुकूमत गाजवली जात आहे. आणि म्हणूनच आम्ही पक्षांच्या पक्ष श्रेष्टींची भेट घेऊन आम्ही निवेदनाच्या माध्यमातून सगळ्या पक्षांशी बोलून २०२४ मध्ये मोदींची सरकार नक्कीच पडेल अशी आशा देखील व्यक्त केली.

तर पंजाबचे भगवंत सिंग मान यांनी देशातील लोक्तांत्रा वाचवायचे असेल तर थिऑस पाऊले उचली गेली पहिजेत आणि आता तीच तयारी सुरु आहे. भाजप सरकारने सगळ्यांना आपल्या हातात आणि बंधनात अडवले घेतले आहे.राजभवन हे भाजपचे हेड ऑफिस बनले आहे तर या भाजप सरकारला या सगळ्याचा आढावा त्यांना हिशोब द्यावा लागतो. देशाचे गव्हर्नर सुद्धा भाजपच्या हातातले खेळणे झाले आहे. आणि त्यामुळे त्यांची कार्यकारी देखील धोक्यात येऊ शकते. रोज राज्याचा कोणता ना कोणता अधिकार हा काढून घेतला जात आजही मग तो कोणत्याही डिपार्टमेंटचा असो. त्यामुळे आपल्या देशाचे खचीकरण होत आहे. देशप्रेमींमणी एकत्र येऊन आपल्या देशाला वाचवण्याचे असेल तर एकत्र येऊन लढायची तयारी करण्यासाठी आम्ही शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांना या संबधी माहिती दिली. शरद पवार यांनी अरविंद केजरील याना सांगितले की , देशात सध्या भाजपकडून लोकशाहीवर आघात सुरु आहेत. ही समस्या फक्त दिल्लीची नाही तर संपूर्ण देशाची आहे. त्यामुळं आम्ही केजरीवाल यांच्या पाठीशी आहोत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अरविंद केजरीवाल यांना समर्थन दिले आहे. तर अरविंदे केजरीवाल हे उद्या खर्गे आणि राहुल गांधी यांची वेळ मागून भेट घेऊन यावर चर्चा मसलत करणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

हे ही वाचा:

राज्याच्या राजकारणात पुन्हा रंगणार काका- पुतण्यांची जोडी

मैदानावरचा “अँग्री यंग मॅन” च्या नावावर आणखी एक विक्रम, आशियामधील पहिला व्यक्ती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss