Thursday, March 28, 2024

Latest Posts

राजीनाम्याच्या निर्णयावरून शिवसेनेच्या आमदाराचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा २ मे रोजी लोक माझा संगतीच्या आत्मचरित्राच्या माध्यमातून केली होती. हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा २ मे रोजी लोक माझा संगतीच्या आत्मचरित्राच्या माध्यमातून केली होती. हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर अनेक बड्या नेत्यांनि आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रत्यत्न देखील केला. त्यानंतर दोन ते तीन दिवसाच्या कालावधी नंतर सहारा पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार यांनी शुक्रवारी मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा केली. पवारांनी मागे घेतलेल्या निर्णयानंतर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

“तुम्ही दोन तारखेचा एपिसोड नीट पहिला तर, जेव्हा शरद पवार यांनी राजीनामा दिला, तेव्हा याबाबतचा कोणताही तणाव सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्यावेळी मनात शंका नक्कीच झाली. शरद पवार एवढ्या मोठ्या पदाचा राजीनामा देत आहेत आणि राजकारणातून बाजूला होत आहेत आणि सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावर तणाव नाही. याचा अर्थ काही तरी घडत आहे, हे नक्की होतं, असं संजय शिरसाट म्हणालेत.तर या संपूर्ण राजीनामा नाटकात सर्वात मोठी भूमिका शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी निभावली आहे. शरद पवारांनी पक्षांतर्गत लोक आणि जे कुणी विरोध करत आहेत, त्यांचा या राजीनामा नाट्यात करेक्ट कार्यक्रम केला. आता पुन्हा अशी हिंमत कराल तर मी माझा बडगा तुम्हाला दाखवीन, असा इशाराच शरद पवार यांनी या राजीनामा नाट्यातून दिला आहे असंही पुढे ते म्हणालेत.

“या संपूर्ण घटनेतून शरद पवार यांनी आपल्या ताकदीची परीक्षा घेतली असल्याचंही ते म्हणालेत. तसेच पक्षांतर्गत बंडाळीची जी चिन्हं दिसत होती, त्याला शमवण्यासाठी केलेले हे एक प्रकारचे नाटक जरी असले, तरी तो एक इशारा त्यांनी या माध्यमातून दिला आहे. शरद पवार हे मोठे राजकारणी आहेत. त्यांनी योग्य वेळी टाकलेली ही गुगली होती. शरद पवार हे एवढे साधे नाहीत. त्यांनी यातून अनेकाचा करेक्ट कार्यक्रमही केला आणि ज्यांना इशारा द्यायचा त्यांना इशाराही दिला” असं शिरसाट म्हणाले आहेत.

हे ही वाचा : 

सोनिया गांधी ४ वर्षानंतर पाहिल्याचं उतरणार प्रचारात

Scorpion Bite, अरे बापरे!, एअर इंडियाच्या विमानात महिलेला विंचवाने घेतला चावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss