spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

फडणवीस आणि पोलीस कोणाता मुहुर्त शोधतायत? जितेंद्र आव्हाड कडाडले

बीड येथील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याच्या अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतिकघुले सोबत वाल्मिक कराड यांचा एकत्रित २९ नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

हा सीसीटीव्ही फुटेज विष्णू छटेच्या केज शहरातील कार्यालयाबाहेरचा आहे. वाल्मिक कराड हा या २९ नोव्हेंबरला कार्यलयात आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटील हेसुद्धा यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत दिसत आहेत. त्यामुळे खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचं बोललं जात आहे. वाल्मिक कराडचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. आणि सुषमा अंधारेंनी देखील सवाल उपस्थित केला आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

वाल्मिक कराडचं खरा गुन्हेगार आहे. पोलिसांसोबत हातमिळवणी करुन खंडणी वसुली या सीसीटीव्ही फुटेजद्वारे उघड झाली आहे. तसेच ती खंडणी नव्हती, तो इलेक्शन फंडसाठी मागितलेला पैसा होता, असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

वाल्मिक कराड छोटा आका आहे. धनंजय मुंडेंनी उघडपणे वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे, असं सांगितलं होतं. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या.अजून किती पुरावे द्यायचे? निलंबित राजेश पाटीलला अजून अटक का नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस कोणाता मुहुर्त शोधतायत? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

सदर माहिती अतिशय धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. हे सर्व पुरावे असतील तर निश्चितपणे आरोपी कोणीही असो, त्याची गय केली जाणार आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय दिला जावा…पुरावा नाही..पुरावा नाही, असं म्हटलं जात होतं. आता पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे या पुराव्यासोबत छेडछाड केली जाऊ नये, याची काळजी घेणं गरजेचं आहे, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले. तसेच आवादा कंपनीमध्ये वाद होतो. यावेळी गावातील अनेक लोक देखील त्याठिकाणी असतात. मग त्यावेळी हे लोक देखील त्यावेळी उपस्थित होती, असं गावातील लोक आतापर्यंत बोलली का नाही?, लोकांवर कोणाचा दबाव होता?, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा : 

घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत

देशाला पहिले खो-खो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या कर्णधारांचे फडणवीसांनी केले विशेष कौतुक, ..ही विजयश्री अविस्मरणीय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss