Mumbai Squad for Ranji Semi-Final : भारतीय संघाचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालची चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, ११ फेब्रुवारी रोजीला अंतिम संघ जाहीर करण्यात आला, तेव्हा वरुण चक्रवर्ती याला मुख्य संघात समावेश करण्यात आला. वरुण चक्रवर्तीला नॉन-ट्रॅव्हलिंग रिझर्व्हवर ठेवण्यात आले. याचा अर्थ म्हणजे तो२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघासोबत खेळणार नाही. वरुण चक्रवर्ती चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर यशस्वी जयस्वालचा रणजी ट्रॉफीसाठी मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला.
यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा रजनी ट्रॉफीसाठी सज्ज
यशस्वी जयस्वाल याची २०२४-२५ रणजी ट्रॉफीसाठी मुंबई संघात पुन्हा एकदा निवड करण्यात आली असून मुंबईने अजिंक्य राहणे याच्या नेतृत्वात उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हा सामना १७ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान नागपूरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट निवड समितीने गुरुवारी १३ फेब्रुवारीला १८ सदस्यीय संघाची घोषणा केलीय. यशस्वीला संघात सामील करण्यात आलं असून त्याला याआधी जम्मू- काश्मीर विरूद्धच्या सामन्यासाठी संधी देण्यात आली होती. तेव्हा तो फक्त ४ आणि २६ धावा करू शकला. या सामन्यातही मुंबई संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
मुंबई स्टार प्लेयर्स
यशस्वी जयस्वाल हा उत्तम खेळाडू असून तुफानी कामगिरी करण्याची क्षमता आहे. मुंबई संघातले स्टार प्लेयर्स अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघ भटकल, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद (विकेटकीपर), हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर आणि हर्ष तन्ना हे असणार आहेत.
हे ही वाचा:
‘राजकारण आम्हाला पण कळतं’; Sanjay Raut यांची तोफ शरद पवारांवर कडाडली