केरळच्या एर्नाकुलममध्ये एकापाठोपाठ एक असे साखळी स्फोट झाले आहेत. स्फोटांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळते. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती आहे. रविवारी सकाळी एकापाठोपाठ तीन बॉम्बस्फोटांनी केरळ हादरलं. केरळमधील एर्नाकुलम येथे एका ख्रिश्चन प्रार्थना सभेत तीन स्फोट झाले आणि एकच गोंधळ उडाला. स्फोटात आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. केरळमधील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे स्फोट झाले.
पोलिसांना घटनास्थळावर स्फोटात वापरलेल्या तारा, बॅटरी आणि इतर संशयास्पद वस्तुही सापडल्या आहेत. हा बॉम्ब टिफिन बॉक्समध्ये ठेवल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
मुंबई, पुण्यात अलर्ट
केरळमध्ये आज सकाळी झालेल्या स्फोटानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करत आहेत. सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यात आली आहे. कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पूर्णपणे काळजी घेण्यात आलेली आहे.
स्फोटांचा तपास NIA करणार
केरळमधील साखळी बॉम्बस्फोटांचा तपास एनआयए (NIA) करणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए लवकरच घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात करणार आहे. एनआयएची फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचणार आहे. साखळी स्फोटांचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
केरळमधील स्फोटाबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री विजयन यांच्याशी फोनवर बोलून सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. गृहमंत्र्यांनी एनआयएला घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हे ही वाचा :
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .