Thursday, April 25, 2024

Latest Posts

Manipur मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी, हिंसाचारात आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून मणिपूर मध्ये अनेक घटना या घडत आहेत. मणिपूरमध्ये ३ मे रोजी आदिवासी आंदोलनात उसळलेल्या हिंसाचारानंतर तब्बल ५२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मणिपूर मध्ये अनेक घटना या घडत आहेत. मणिपूरमध्ये ३ मे रोजी आदिवासी आंदोलनात उसळलेल्या हिंसाचारानंतर तब्बल ५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी हा हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलं आहे. तसंच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

तर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी शनिवारी दिनांक ६ मे रोजी हिंसाचाराच्या संदर्भात सर्व पक्षांची बैठक बोलावली होती. यासोबतच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरक्षा दलांशी बोलून हिंसाचार संपवून शांतता राखण्यास सांगितले. तसेच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे राज्याच्या आयर्न लेडी इरोम शर्मिला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्याच्या दौऱ्यावर येण्याचे आवाहन केले आहे .

काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले आहेत की, “मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान, सर्व उजव्या विचारसरणीच्या भारतीयांनी स्वतःला विचारले पाहिजे की आम्हाला आश्वासन दिले गेलेल्या बहुचर्चित सुशासनाचे काय झाले. भाजपला त्यांच्या राज्यात सत्तेवर आणल्यानंतर एक वर्षानंतर मतदारांनी मणिपूरच्या लोकांना खूप फसवल्यासारखे वाटत आहे. राष्ट्रपती राजवटीची वेळ आली आहे. ज्या कामासाठी राज्य सरकार निवडून आले ते काम करण्यास सक्षम नाही. तर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी शनिवारी रात्री उशिरा सांगितले की, चुरचंदपूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारली आहे. ते म्हणाले की, सरकार आणि विविध पक्षांमधील चर्चेनंतर कर्फ्यू अंशतः शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात मला आनंद होत आहे.

शनिवारी रात्री सीएम सचिवालयात पत्रकार परिषदेत मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह म्हणाले की, राज्यात कलम ३५५ लागू करण्यात आलेले नाही. हा संभ्रम काही घटकांनी निर्माण केला आहे. कलम ३५५ अन्वये अशी तरतूद आहे की, बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत गडबड झाल्यास केंद्र सरकारने राज्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, राज्यात आतापर्यंत ५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, राज्य सरकारने मृतांची अधिकृत संख्या दिलेली नाही. राज्याचे डीजीपी, पी डोंगले यांनी डेटा जाहीर न करण्यामागे सुरक्षा हे कारण सांगितले आहे. चुरचंदपूर येथे शुक्रवारी सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरक्षा दलाने तीन जणांना गोळ्या घातल्याचा आरोप आहे, मेईतेई समुदायाच्या लोकांनी सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आंदोलन केल्यावर सुरक्षा दलांना गोळीबार करावा लागला.

हे ही वाचा : 

दोहा डायमंड लीग जिंकून नीरज चोप्रा जागतिक आघाडीवर

राजीनाम्याच्या निर्णयावरून शिवसेनेच्या आमदाराचा टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss