Friday, April 19, 2024

Latest Posts

सिडनीतून आपल्या सरकारबद्दल काय म्हणाले नरेंद्र मोदी …

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचा दौरा केला आणि त्यानंतर लगेचच ते दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले आहेत. सिडनीतील कुडोस बँक एरिना येथे भारतीय समुदायाच्या एका कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचा दौरा केला आणि त्यानंतर लगेचच ते दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले आहेत. सिडनीतील कुडोस बँक एरिना येथे भारतीय समुदायाच्या एका कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सिडनीतील कुडोस बँक एरिना या कार्यक्रमात भारतचे नरेंद्र मोदी हे सहभागी झाले होते. यावेळी गणपती बाप्पा मोरया, भारत माता की जय आणि मोदी-मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमादरम्यान पीएम नरेंद्र मोदी यांच्या सोबत ऑस्ट्रेलियाचे पीएम अँथनी अल्बानीज देखील उपस्थित होते. सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये असलेल्या या स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० हजार भारतीयांना संबोधित केले. सांस्कृतिक आणि रंगारंग कार्यक्रमाच्या माध्यमातून येथे पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले.

नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक भारतीय लोकांना संबोधित करून भाषण देखील केले. भारतीय लोकांचे जीवन डिजिटल क्रांतीने बदलले आहे. शाळांचे प्रमापपत्रे असो की लायसन्स सर्व डिजिटल लॉकरवर उपलब्ध झाले आहे. यामुळे आता सर्वसामान्यांपासून ते मोठ मोठ्या दुकानांपर्यंत डिजिटल क्रांती दिसत आहे. सिडनीच्या या कार्यक्रमात २० हजार लोकांना संबोधित करून भारतीयांची माने जिंकली. बभरात हा देश आता हळू हळू डिजिटल कडे वळताना दिसत आहे. आणि त्यामुळे आमच्या देशाची सुद्धा प्रगती होत आहे.आमचा देश सुद्धा पुढे येईल आणि नवा इतिहास रुचेल असे मत नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमातून व्यक्त केले. 

नरेंद्र मोदी यांनी सिडनीतून भारतीयांशी संवाद साधला यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारताला उद्देशून काही मत मांडली. भारतातील प्रत्येक गरिबासाठी माझे स्वप्न होते, ते पूर्ण झाले आहे. सर्व गरीबाचे बँक खाती झाली आहे. देशातील ५० कोटी भारतींयाची खाती उघडली गेली आहे. त्यांना बँकेचे सर्व फायदे मिळत आहे. जनधन बँक खाते, आधार आणि मोबाइलची लिंक केली गेली आहे. त्याचबरोबर जगात अनेक देशात बँकींग प्रणाली संकटात आहे. परंतु भारताची बँकींग प्रणालीचे कौतूक होत आहे. भारताने विक्रमी निर्यात केली आहे. तसेच कोरोनाच्या काळात अनेक देशांना त्यांच्या नागरिकांना पैसे पाठवण्यात अडचणी येत होत्या. पण भारतात हे काम काही क्षणातच झाले. ४०% रिअल टाइम डिजिटल पेमेंट एकट्या भारतात होतात. आज फळं, भाजी किंवा पाणीपुरीच्या गाड्या असोत, सगळीकडे डिजिटल व्यवहार होत आहेत. आणि म्हंणूनच भारत देश आता डिजिटल होत आहे असे मत त्यांनी या व्यासपीठावरून मांडले.

जगात जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा भारत मदतीसाठी तत्पर असतो. कोणतीही आपत्ती आली तर भारत मदतीसाठी नेहमीच पुढे येतो. आज भारत ग्लोबल ग्रोथच्या जोरावर काम करत आहे. आम्ही जगाला जोडण्यासाठी काम करत आहोत. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न… हाच आपल्या सरकारचा आधार आहे. ही आमची दृष्टी आहे. असे मत त्यांनी भारतीय वंशातील लोकांसमोर सांगितले. क्रिकेट आपल्याला वर्षानुवर्षे जोडत आहे. पण आता टेनिस आणि चित्रपटही आपल्याला जोडत आहेत. आमची खाण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी आता मास्टर शेफ आम्हाला जोडत आहेत. ऑस्ट्रेलियाने भारताची ही विविधता खुल्या मनाने स्वीकारली आहे. भारतात जेव्ही तुम्ही येणार तुमच्या सोबत ऑस्ट्रेलियन मित्रांना घेऊन या. यामुळे त्यांना भारतातील संस्कृती जवळून पाहत येईल.

हे ही वाचा:

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर, पहिल्या चार क्रमांकावर मुलींनी मारली बाजी

Sydneyमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांवर काय म्हणाले पंतप्रधान मोदी? घ्या जाणून…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss