२ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली. ड्रग्जप्रकरणात केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह २० जणांना अटक देखील करण्यात आली होती. तेव्हा एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे होते. एनसीबीने आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडीत ठेवलं होतं. पण, पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यातच आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची लाच समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली होती. त्याचप्रकरणात सीबीआयने छापेमारी केली. तसंच, समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला.
हे ही वाचा :
Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? Eknath Shinde की Raj Thackeray?
Rang Maza Vegla मालिकेत कार्तिक घेणार का दीपाचा जीव?