ठाकरेंचा वारसा ‘ते’ सांगतील इतके आम्ही….काय म्हणाले Sanjay Raut?

ठाकरेंचा वारसा ‘ते’ सांगतील इतके आम्ही….काय म्हणाले Sanjay Raut?

मोदी आणि अमित शहा यांना ज्यांच्यापासून भीती, त्यांना ते अटक करू शकतात असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला. केजरीवाल राजकारणात आले आणि मोठी पार्टी त्यांनी तयार केली. पंजाब दिल्ली आणि पूर्ण देशात त्यांची पार्टी आहे. अण्णा हजारेंबरोबर लढाई केली आणि आज त्यांची पार्टी वाढत आहे. भाजपला भीती आहे, इंडिया गटबंधनचा एक भाग आहे. हा घोटाळा फक्त कागदावरच आहे. तानाशाहीने राज्यात अशी कारवाई होत असल्याचे राऊत म्हणाले.

एकेकाळी नरेंद्र मोदी देखील भ्रष्टाचाराच्या विरोधात केजरीवालांबरोबर लढत होते. अरविंद केजरीवाल यांना राजकीय सूडबुद्धीने अटक केलेली आहे. ही बेकायदेशीर अटक आहे. हजारो कोटी रुपयांचा घोटाळा भाजप यांच्याकडे शेकलेला आहे. खंडणीच्या  माध्यमातून, दहशतीच्या माध्यमातून हप्ता गोळा केलेला आहे. भारतीय जनता पार्टी स्वतःला मोठी समजत आहे. गोवंश हत्या बंदी मोठे आंदोलन केले. आपल्या लोकांना मॉबब्लीचिंग केले. गाय-मांसबाबत देखील पैसे उकळले आहे. कोणती कंपनी आहे ते मी सांगेल. लिकर घोटाळा करून अनेक लोक जेलमध्ये गेले आहेत. मनी लॉन्ड्रीचा खटला पहिला तुमच्या अध्यक्षांवरती झाला पाहिजे, असे मत संजय राऊत यांनी मांडले.

अण्णा हजारे यांना पहिले जागा करा, कुठे आहेत ते ? मला माहित नाही ते कुठे असतात. एकेकाळी त्यांचे आंदोलन व्हायचे. ते आता कुठे हरवले आहेत ते मला माहिती नाही. आम्ही दिल्लीतील प्रमुख नेत्यांशी आणि नाना पटोले यांच्याशी सांगलीच्या उमेदवाराबाबत चर्चा करणार आहोत. काय असतो तो विडा हिंदुत्वाचा? कोणत्या पानाच्या गादीवर भेटतो ते  त्यांना विचारा, असे राऊत म्हणाले. या महाराष्ट्रामध्ये अफजलखानाने देखील विडा उचलला होता. त्या विड्याचा काही भाग शिंदेंकडे असेल. त्यांच्या पानाचा विडा कोणत्या गादीवरती भेटतो दिल्लीतील आणि गुजरातमधील? त्यांना एकदा विचारून घ्या, असे संजय राऊत म्हणाले. उद्या ते छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील वारसदार ठरवतील. ते कोणाचेही वारसदार ठरू शकतात. हिंदुहृद्यसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा भारतीय जनता पक्षाने सांगण्यातइतके आम्ही खाली घसरलो नाही. आपल्या स्वार्थासाठी राजकीय फायद्यासाठी हिंदुहृद्यसम्राट पक्षप्रमुख यांचा पक्ष फोडतात आणि महाराष्ट्र तोडण्याची स्वप्न बघतात त्यांच्याकडून वारसा हे काय आम्ही शिकायचं? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या प्रश्नावर बोलताना उपस्थित केला.

हे ही वाचा:

मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चव घेऊ शकते;पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे इच्छुक

सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत; मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version