सध्या सोनी वाहिनी वर प्रसिद्ध असलेला शो म्हणजे ”महाराष्ट्राची हास्य जत्रा” (Maharshtrachi Hasya Jatra). महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात काम करत असलेला “फिल्टर पाड्याचा बच्चन “अशी ओळख असलेले गौरव मोरे (Gaurav More) हा शो सोडणार असल्याची चर्चा सुरु होती पण आज ८ मे २०२४ ला त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने “मी सगळ्याची मनापासून माफी मागतो'”असं लिहत चाहत्यांना धक्का दिला.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून गौरवने अनेकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं होतं. गौरव ने या कार्यक्रमात आपली नवी ओळख तयार केली आहे. तो सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असतो.शुटिंग दरम्यान केलेली मज्जा, नम्रता संभेराव, समिर चौघुले, प्रसाद खांडेकर यांच्यासोबत धम्माल मस्ती तो सोशल मिडियावर शेअर करत असतो पण आज त्याने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली ”नमस्कार पवई फिल्टरपाड्याचा मी गौरव मोरे. तानानानाना आरा बाप मारतो का काय मी.. ये बच्ची … रसिक पेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं,नाव दिलं, सन्मान दिला त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मी गौरव मोरे मला सांगताना खूप वाईट वाटत आहे की, मी आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेतून निरोप घेत आहे. माझ्या कामातून जर कोणाचे मन दुखावले असेल तर मी त्या सगळ्याची मनापासून माफी मागतो”. अशी पोस्ट शेअर करत चाहत्यांना नाराज केलं आहे.
पुढे त्यांनी सांगितले, “महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. माध्यम सारखाच असेल आणि तुमचं प्रेम पण…..असं म्हणतात, नव्या प्रवासाची गोष्ट और असते,म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शोसाठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरु झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे. म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा असेच राहू दे.”असे देखील त्या पोस्टमध्ये सांगितले आहे.
दरम्यान, याआधी ओंकार भोजने याने देखील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचा निरोप घेतला होता. गौरव मोरे हा नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.”मॅडनेस मचायेंगे” या शोमध्ये गौरव मोरे झळकणार आहे. हा शो सोनी वाहिनीवर दिसणार आहे. हेमांगी कवी, कुशल बद्रिके हे मराठी कलाकार गौरवसोबत असणार आहेत. गेल्याच महिन्यात गौरव मॅडनेस माचयेंगे या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यामुळे हास्य जत्रा सोडणार का हा प्रश्न सर्वानाच पडला होता. पण आता गौरवने पोस्ट शेअर करत याची बातमी दिली आहे. चाहत्यांनी गौरवला हास्यजत्रा सोडू नका असा ही सल्ला दिला होता.
हे ही वाचा:
साबुदाण्याची खिचडी तर सर्वानाच माहिती आहे ,
पण कधी साबुदाण्याचे पराठे ट्राय केलेत का? Mother’s Day का साजरा करतात तुम्हाला माहिती आहे का?
Follow Us