ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची आहे – Dr. Shrikant Shinde

ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची आहे – Dr. Shrikant Shinde
कल्याण लोकसभेतील उल्हासनगर येथे आयोजित महायुतीच्या संवाद मेळाव्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली होती.  याप्रसंगी संवाद साधताना ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची निवडणूक आहे, त्यामुळे पुढील २० दिवस आपण सर्वांनी मिळून प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आपण केलेली कामे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवायची आहेत, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
 
उल्हासनगर शहरात गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. भुयारी गटार योजना, सिमेंट काँक्रिटचे रस्ते, कॅशलेस हॉस्पिटल, कामगार हॉस्पिटल अशा अनेक सुविधा आपण आत्तापर्यंत पुरवल्या आहेत. उल्हासनगरमधील अनधिकृत इमारतींचे नियमितीकरण आणि पुनर्विकास यासाठी नियम बदलून राज्य सरकारने आणलेले धोरण हा सर्वात महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने उल्हासनगरसाठी घेतला आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान होणे गरजेचे आहे. त्यामुळेच महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी २० मे रोजी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
 
याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, साई पार्टीचे अध्यक्ष जीवन इदनानी, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव भरत गंगोत्री, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे, शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, दिलीप गायकवाड, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर, रमेश चव्हाण, शिवसेना महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, माजी महापौर राजश्री चौधरी, लिलाबाई आशान, मीना कुमार आयलानी, राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिव सोनिया धामी यांच्यासह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

हे ही वाचा:

“Amit Shah आणि Yogi यांनी कोकणात येऊ नये”; भास्कर जाधवांचा इशारा

४०० खासदारांमध्ये कोल्हापूर आणि हातकणंगलेचे दोन खासदार असावेत – CM Eknath Shinde

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version