वेलची आणि दुध शरीरासाठी ठरतात गुणकारी,जाणुन घ्या फायदे

आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक खाद्य पदार्थांचा समावेश होत असतो.

वेलची आणि दुध शरीरासाठी ठरतात गुणकारी,जाणुन घ्या फायदे

आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक खाद्य पदार्थांचा समावेश होत असतो.दरम्यान दुध हे पोषक घटक आहे,की यामुळे आपले शरीरातील हाड मजबुत राहण्यासाठी खुप उपयोगी पडत.दररोज सकाळी नाश्त्यात किंवा रात्री एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला घरातील वडीलधारी मंडळी नक्कीच देतात. कारण यामध्ये असलेले कॅल्शियम आणि प्रथिने तुमच्या हाडांच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या चांगल्या विकासासाठी खूप आवश्यक आहेत.तर काहीजंनाना दुध हे नुसतं प्यायला आवडत नाही,तर काहींना दुध फार आवडतं,तर ज्याला फक्त पांढरं दुध प्यायला आवडत नाही,ते दुधात वेलची टाकुन किंवा वेलची पावडर टाकुन नक्कीच पिऊ शकतात.दुधात वेलची घालून त्याचे सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात. दोन्हीतील पोषक तत्व शरीराच्या आरोग्यासाठी खूप मदत करतात.वेलची दुधात मिसळली की त्यातील पोषकतत्त्वे वाढतात. वेलची मिसळलेले दूध पिण्याचा सल्ला अनेकांना दिला जातो. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठीही वेलचीचे दूध खूप फायदेशीर आहे. वेलची आणि दूध या दोन्हीमध्ये मॅग्नेशियम आढळते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.अनेक खाद्यपदार्थांमध्ये वेलचीचा समावेश केला जातो. अन्नाची चव वाढवण्यासाठी वेलचीचा उपयोग केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने वेलची खूप फायदेशीर आहे. वेलचीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी6, प्रथिने, फायबर, रिबोफ्लेविन, नियासिन इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात. दुधात मिसळून वेलची घेतल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते.

दूध आणि वेलचीचे फायदे

दूध आणि वेलचीचे या दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्याने चयापचय वाढतो. यामुळे पचनक्रिया मजबूत होते. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या कमी होतात.त्यांचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी होते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन केल्यास अनेक फायदे होतात. यामुळे चांगली झोप येते.हे दूध सर्दी-खोकलामध्येही खूप फायदेशीर आहे. तसेच छातीत साचलेला कफ काढून टाकण्यास खूप मदत होते. सर्दी खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.वेलची टाकलेले दुध प्याल्यांने शरीरातील अनेक ब्याधींचा त्रास दुर होतो.

हे ही वाचा:

मृत्यूच्या खोट्या बातमीनंतर पूनम पांडे पहिल्यांदाच दिसली बाहेर,घेतले देवाचे दर्शन

‘ठरलं तर मग’ मालिकेतअर्जुन आणि चैतन्यच्या मैत्रीत फूट पाडण्याचा साक्षीचा डाव यशस्वी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version