‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.मालिकेतील कलाकारांवर देखील प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देत असतात.टीआरपीच्या यादीत कायम आपलं अव्वल स्थान या मालिकेने निर्माण केलेलं आहे.सध्या या मालिकेत आता रजंक वळण आलेलं पाहयला मिळत आहेत.अर्जुन आणि चैतन्यच्या घट्ट मैत्रीत आता फूट पडताना दिसून येत आहे.मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला साक्षी अर्जुनला ऑफिसमध्ये भेटायला जाते. तेव्हा तिला तिथे पाहून अर्जुन चा रागाचा पारा चढतो आणि तो तिला बाहेर जायला सांगतो पण साक्षी सतत त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. सायली तिला काही सांगायला जाणार तितक्यात चैतन्य तिथे येतो आणि साक्षी तू हाच अपमान करून घ्यायला येथे आली आहेस का असं म्हणतो.
अर्जुनच्या ऑफिस मध्ये साक्षी चैतन्य समोर तिचे खोटं नाटक करण सुरु करते. हे सर्व पाहून अर्जुन ला देखील राग येत असतो आणि तो तिला ओरडू लागतो. त्यावर चैतन्य म्हणतो साक्षीने मला शप्पथ घातली त्यामुळे मी शांत आहे नाहीतर तुला तुझा आरोगंस दाखवून दिला असता. साक्षी म्हणते जशी सायली चैतन्यला चैतन्य भाऊजी म्हणते तसेच मला तुम्हाला अर्जुन भाऊजी म्हणायला आवडलं असतं पण तुम्ही तो अधिकार मला दिलाच नाही.चैतन्यवर माझं मनापासून प्रेम आहे मी त्याच्यावर खुप प्रेम करते हे सगळं खोटेनाटे ती चैतन्य समोर बोलते.जसं माझं चैतन्यवर प्रेम आहे,तसंच तुमची मैत्री मला अनमोल आहे. पूर्वीच मला माझ्या मोठ्या दिराचे आणि मोठ्या जावेचे आशीर्वाद घ्यायला यायला हवं होतं असं खोटं रडत सांगू लागते. यावर अर्जुन म्हणतो चैतन्यला देखील असंच खोटा ड्रामा करून फसवलं हो ना… यावर साक्षी पुन्हा माझं चैतन्य वर खूप प्रेम आहे. मी खोटं बोलत नाही आमचं नातं पवित्र आहे असं म्हणून पॅनिक होण्याचा नाटक करते.
यावर अर्जुन तू किती खालच्या पातळीची मुलगी आहेस असं साक्षीला म्हणतो. चैतन्य भलताच चिडतो आणि साक्षीला तिथून जायला सांगतो. निघून जात असताना अर्जुन त्याला म्हणतो की चैतन्य याला प्रेम म्हणत नाहीत तर ट्रॅप म्हणतात. आश्रम मर्डर केस मधून सुटण्यासाठी तिने हा ट्रॅप लावला आहे ज्यात तू अडकून बसला आहेस. त्यानंतर सायली चैतन्याला तिला तिथून घेऊन जाण्याची विनंती करते. प्रकरण शांत करत सायली म्हणते की आपण एखादा वेळ ठरवून यावर बोलू तेव्हा सर्वजण शांत झालेले असतील. त्यानंतर साक्षी पुन्हा मनातल्या मनात नवा डाव रचण्याचा प्रयत्न करते आणि अर्जुनचे पाय पकडत तुम्हाला जे काही बोलायचे ते बोला पण माझ्या प्रेमावर संशय घेऊ नका असे म्हणू लागते. हा सर्व प्रकार पाहून चैतन्य तिला उठवतो आणि या स्वार्थी माणसाच्या पाया पडून काही उपयोग नाही असे म्हणतो.
चैतन्य साक्षीला शांत करत असतोच तितक्यात पुन्हा अर्जुन या फ्रॉड मुलीला इथून घेऊन जा असे त्याला सांगतो. त्यावर चैतन्य रागात अर्जुनला, साक्षीच्या चारित्र्याबद्दल बोलण्याचा तुला काही अधिकार नाही आणि तुझी लायकी ही नाही असे म्हणतो. अर्जुन त्याचं बोट झटकून मी साक्षी बद्दल असच बोलणार असे ठामपणे सांगतो. त्यानंतर चैतन्य चक्क अर्जुनची कॉलर पकडतो. त्यांच्यामध्ये सायली पडून दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करते. पुन्हा साक्षी ड्रामा करून हे सर्व माझ्यामुळे होत आहे मी इथून निघून जाते असं म्हणत ऑफिसच्या बाहेर पडते.
पुढच्या भागा मध्ये पुन्हा अर्जुन आणि चैतन्य भांडत असताना सायली त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते. पण तरीही साक्षी कशी मैत्रीची भीक मागत होती याबद्दल चैतन्य बोलू लागतो. यावर अर्जुन तिच्या आधी मी तुला इथून हाकलून दिला पाहिजे होतं असं म्हणतो. तसाच गणपत शिखरे आणि साक्षीशी आपल्या मैत्रीचं डिल केलंस का असा प्रश्न अर्जुनला विचारतो. यावर चैतन्य म्हणतो मी आपल्या केसबद्दल तिला जाऊन सांगेन असं वाटलंच कसं तुला. आपल्याला जर सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं हे सुद्धा मी तिला सांगितलं नाही. कोर्टात तिच्यावर आरोपांचे बॉम्ब पडू दिले असे सांगतो.आता या दोघांच्या मैत्रीत फूट पाडण्याचा साक्षीचा डाव यशस्वी होईल का ?पुन्हा अर्जुन-चैतन्यची मैत्री पहिल्यासारखी होणार का? हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणारं आहे.
हे ही वाचा:
विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी Amit Thackeray यांचा धडक मोर्चा
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ओळख – Ajit Pawar
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.