लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024) तीन टप्पे पार पडले असून सर्वच पक्ष प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. अश्यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तेलंगणा येथील एका सभेत काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. ऐन निवडणुकीत राहुल गांधी अंबानी अदानीवरून गप्प का आहेत? असा सवाल विचारत नरेंद्र मोदी यांनी अंबानी अदानीकडून राहुल गांधींनी पैसा घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे, राजकीय विश्वात खळबळ उडाली असून राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत पंतप्रधान मोदींना सडेतोड उत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील करीमनगर येथील एका सभेत राहुल गांधी यांना लक्ष्य केले. यावेळी ते म्हणाले, “वर्षानुवर्षे काँग्रेसचे शाहजादे दिवसरात्र फक्त ‘पाच उद्योगपती, अंबानी, अदानी’ हीच माला जपायचे. पण निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी अंबानी-अदानी यांना शिव्या देणे बंद केले आहे. असे का? मला काँग्रेसच्या शहजाद्याला विचारायचे आहे कि, त्यांनी अंबानी-अदानीकडून किती काळा पैसा मिळवला? या उद्योगपतींकडून काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी किती ‘मिळाले’?” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींना सडेतोड उत्तर दिले आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ पोस्ट करत ते म्हणाले, “नमस्कार मोदीजी! थोडे घाबरले आहात का? तुम्ही पहिल्यांदाच अदानी-अंबानीबद्दल जाहीरपणे बोललात. तुम्हाला हेदेखील माहीत आहे कि ते टेम्पोमध्ये पैसे देतात. हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? एक काम करा, त्यांच्याकडे ईडी-सीबीआय पाठवा. लवकरात लवकर पूर्ण माहिती मिळवा. मोदीजी घाबरू नका. मी देशाला पुन्हा पुन्हा सांगत आहे, नरेंद्र मोदीजींनी जेवढा पैसे त्यानाच दिला आहे तेवढाच पैसा आम्ही भारतातील गरीब लोकांसाठी देणार आहोत. महालक्ष्मी योजना, पहिली नोकरी निश्चित योजना या योजनांद्वारे कोट्यवधी लोकांना लखपती बनवणार आहोत. त्यांनी २२ अब्जाधिश केले, आम्ही करोडो लखपती बनवणार आहोत.”
हे ही वाचा:
राज ठाकरे पु्न्हा भाजपच्या मंचावर; मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी ठाकरेंची सभा
Uddhav Thackeray मतांसाठी लाचार, आज Balasaheb Thackeray असते तर… Devendra Fadnavis यांचे ताशेरे !
Follow Us