शिवसेना उबाठा गटाच्या (Shivsena UBT) राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर वादग्रस्त विधान केले. त्यावरून, आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena) नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायाला मिळत आहे. आता, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी प्रियांका चतुर्वेदी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले असून, “प्रियंका चतुर्वेदी या वैफल्यग्रस्त झाल्या आहेत,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे म्हणाल्या, “प्रियांका चतुर्वेदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल गद्दारी वरून जे वक्तव्य केले आहे. अनेक वर्षांपासून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून प्रियांका चतुर्वेदी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. प्रियांका चतुर्वेदी यांना लोकसभेत निवडून जायचे आहे मात्र देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असल्याने आपण निवडून येणार नाहीत म्हणून त्या वैफल्यग्रस्त झाल्या आहेत. त्यांचेच लोकं बोलतात की, त्या संध्याकाळनंतर भेटत नाहीत ८ नंतर त्या उपलब्ध नसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ तास लोकांसाठी उपलब्ध असतात. डॉ. श्रीकांत शिंदे देखील २४ तास लोकांसाठी उपलब्ध असतात मग प्रियांका चतुर्वेदी का उपलब्ध नसतात ? प्रियांका चतुर्वेदी यांना खासदारकी लढायची आहे तर आपल्याबद्दल लोकं काय बोलतात याचा त्यांनी विचार करायला हवा.” असे त्या म्हणाल्या.
उत्तर पूर्व मुंबई येथील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ घाटकोपर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रियांका चतुर्वेदी यांनी महायुतीवर जोरदार टीका केली यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “गद्दार गद्दारही रहेगा! दिवार नावाचा एक चित्रपट आलेला… त्यात अमिताभ बच्चनच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असं लिहिलेलं असत. पण यांच्या कपाळावर ‘मेरा बाप गद्दार है’ असं लिहिलंय.. मी यावर जास्त काही बोलणार नाही,” असे त्या म्हणाल्या होत्या. यावरून शिंदेगटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून अनेक नेते यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.
हे ही वाचा:
Eknath Shinde आणि Ajit Pawar यांना BJP कवडीची किंमत देत नाही – Bhaskar Jadhav
Follow Us