तुम्ही शेण खा नायतर ***, Prasad Lad यांचे Uddhav Thackeray यांना प्रत्युत्तर

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर "तुम्ही शेण खा नाहीतर **, दोन्ही सारखाच आहे" असे म्हणत टीका केली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत.

तुम्ही शेण खा नायतर ***, Prasad Lad यांचे Uddhav Thackeray यांना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुतीवर (Mahayuti) टीका करताना, ‘आम्ही शेण खाल्ले आत तुम्ही काय करताय?’ या वक्तव्याचा विरोधकांनी आता चांगलाच समाचार घेतला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर “तुम्ही शेण खा नाहीतर **, दोन्ही सारखाच आहे” असे म्हणत टीका केली आहे. त्यामुळे महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मध्ये जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रसाद लाड माध्यमांशी बोलताना म्हणाले, “देशात एक पप्पू आहे. तसाच राज्यात देखील उद्धव ठाकरे नावाचा पप्पू आहे. उद्धव ठाकरे म्हंटले कि, मी शेण खाल्ले म्हणून तुम्ही शेण खाणार का? ते शेण काय शेणाच्या पलीकडे सगळं खाल्लं आहे. खिचडी, मिठी नदीच्या चिखलातील देखील खाल्ले. मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम कोणी केले असेल तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने, संजय राऊतांनी केले आहे. “

पुढे ते म्हणाले, “कोरोना काळात जीव वाचवणारे रेमेडिसिव्हर औषध कुठेच मिळत नव्हते. ते औषध पुरवण्याची सोया मी आणि प्रवीण दरेकर यांनी केली. ते औषध आम्हाला ३५० रुपयांना मिळत होते. पण त्यांना ते १६०० ला विकत घ्यायचे होते. ज्यामुळे माणसाचा जीव वाचत होता त्यामध्ये देखील यांना दलाली खायची होती. मेमेल्या माणसाची प्लॅस्टिकची बॅग त्यामध्ये देखील ४५०० खायचे होते. मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणारा माणूस शेण खाउदे किंवा *** खाउदे सारखाच आहे,” असे ते म्हणाले.

“आम्ही उद्धव ठाकरेंसारखे धंदे करणार नाहीत. उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्ना केला. पण ते यशस्वी झाले नाहीत. कारण ते चुकीच्या मार्गाने चालले होते. ज्याप्रमाणे केजरीवाल वाचले नाहीत त्याप्रमाणे हेदेखील वाचणार नाहीत.” संजय राऊत यांच्यावर टीका करत प्रसाद लाड म्हणाले, “संजय राऊतांकडे बोलायला काही राहिले नाही ते भ्रमिष्ठ आणि बिथरले आहेत. एखाद्या व्यक्तीसोबत सातत्याने राहिल्याने त्याचे गुण आणि अवगुण दोन्ही येतात. संजय राऊतांचे दोन्ही गुण उद्धव ठाकरेंकडे उतरले आहेत. आता राऊत नावाचा पोपट काय बोलतो हे महाराष्ट्रातील जनता आता ऐकत नाही.”

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात १४ मी रोजी मतदान पार पडणार आहे. त्यावरून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून आता कोल्हापूरच्या जागांवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जुंपली आहे. शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुतीवर टीका करत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती (Chhatrapati Shahu Maharaj) यांच्याविरुद्ध महायुतीने उमेदवार दिल्याने खरपूस भाषेत टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर टीका करत, ‘आम्ही शेण खाल्ले म्हणून तुम्हीसुद्धा खाणार का? ‘ असा सवाल महायुतीच्या नेत्यांना केला होता.

हे ही वाचा:

अस्वस्थ झाले असते तर ८४ वर्ष….नारायण राणेंची शरद पवारांवर टीका

प्रत्येक बापानं दमणाऱ्या बापाला भटकती आत्मा म्हणणाऱ्याला… Jitendra Awhad यांची आक्रमक भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version