छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेची वेळ लक्षात ठेऊन ती मालिका पाहिली जाते.प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात.दरम्यान मालिका म्हंटलं तर ट्विस्ट हा येणारचं.ट्विस्टचं मालिकेला खिळवून ठेवत असते. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते.टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेने नेहमीप्रमाणे या आठवड्यातही टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात…
- ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.
- तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे.
- ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.
- ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत चौथ्या क्रमाकांवर असून या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.
- टीआरपी लिस्टमध्ये ‘आई कुठे काय करते’ ही मालिका पाचव्या स्थानावर आहे. या मालिकेला 5.8 रेटिंग मिळाले आहे.
- ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर असून या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे.
- ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सातव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.4 रेटिंग मिळाले आहे.
- ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.0 रेटिंग मिळाले आहे.
- टीआरपीच्या शर्यतीत ‘आता होऊ दे धिंगाणा 2’ हा कार्यक्रम नवव्या क्रमांकावर आहे. या कार्यक्रमाला 3.9 रेटिंग मिळाले आहे.
- ‘शुभविवाह’ ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.6 रेटिंग मिळाले आहे.
दरम्यान या आठवड्यात देखील ‘ठरलं तर मग’ या मालिकेला सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे. या मालिकेच्या महाएपिसोडला 5.0 रेटिंग मिळाले आहे. तर ‘शुभविवाह’ मालिकेच्या महाएपिसोडला 3.5 रेटिंग मिळाले आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सध्या लग्नसोहळा पाहायला मिळत आहे. मुक्ता आणि सागरच्या विवाहसोहळ्यामुळे मालिकेला टीआरपीसाठी फायदाच झाला आहे.दरम्यान आता प्रेमाची गोष्ट आणि ठरलं तर मग या मालिकेला प्रेक्षक चांगली पसंती देत आहेत.आणि या दोन्ही मालिका आता एकमेकांना टक्कर देणार का हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.
हे ही वाचा:
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, अडीच वर्षाची चिमुकली खाडीत बुडाली
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २० जानेवारीला आझाद मैदानात मनोज जरांगेंच आमरण उपोषण
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.