Friday, May 17, 2024

Latest Posts

प्रिया आणि अस्मिताचा नवा डाव,दागिने स्वत:च गायब करुन सायलीवर घेतला चोरीचा आळ

छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत.मालिकेतील कलाकारांना देखील प्रेक्षक चांगली पसंती दर्शवतात.

छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत.मालिकेतील कलाकारांना देखील प्रेक्षक चांगली पसंती दर्शवतात.अशातच टीआरपीच्या यादीत या मालिकेनं आतापर्यंत पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे.तर मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला अर्जुन पोलिसांकडे सायली हरवल्याची तक्रार करतो. अर्जुनचे फोनवरचे बोलणे ऐकून प्रिया चांगलीच घाबरते आणि काहीतरी प्लॅन करायचा म्हणून अस्मिताला घेऊन जाते. किडनॅप झाल्यामुळे सायली फारच थकलेली असते तेव्हा तिला पुन्हा अर्जुन चा भास होऊ लागतो. तो तिला म्हणतो की तुम्ही आत्ताच थकून गेलात तर कसं चालेले. मी तुम्हाला हरू देणार नाही काही झालं तरी आपण दोघं मिळून ही लढाई लढायची. तितक्यात साक्षीचे गुंड तिथे येतात आणि सायलीच्या डोळ्यांवर पट्टी बांधतात.

दुसरीकडे प्रिया अस्मिताला खोलीत घेऊन जाते आणि सायली बद्दल कान भरू लागते. आश्रमात असताना सायली सर्वांचे पैसे चोरायची आणि पळून जायचे तेव्हा मधु भाऊ सर्वांच्या हाता पाया पडून ते पैसे परत करायचे आणि तिला पुन्हा घेऊन यायचे असं खोटं सांगते. त्यामुळे ती आता सुद्धा अशीच पळून गेली असणार. अस्मिता तिला म्हणते की आपण हे खाली जाऊन सांगू पण ती म्हणते की जर ती पैसे घेऊन गेली असेल तर आपल्याला ते सिद्ध करता येणार नाही त्यापेक्षा आपणच तिला अडकवायला काही पैसे लंपास करून आणि सांगू की ते पैसे सायली घेऊन गेली आहे.

अस्मितालाही कल्पना आवडते आणि ती पैशांची सोय करायला जाते. त्यानंतर प्रिया साक्षीला फोन करून आपल्या प्लॅन बद्दल सांगते. सायलीच्या फोनवरून असा मेसेज कर जेणेकरून ती स्वतः पळून गेल्याचे सर्वांना समजेल असं ती साक्षीला सांगते. त्यानंतर साक्षी गपचूप सायलीला जिथे डांबून ठेवलेले आहे तिथे जाते आणि सायलीच्या फोनवरून खोटा मेसेज कल्पनाला पाठवते. दुसरीकडे सायलीला अडकवण्यासाठी प्रिया व अस्मिता काही पैसे लपवतात आणि खाली जाऊन सायली पैसे घेऊन पळून गेल्याचे सांगतात. त्या ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसतो. पण अर्जुन ला त्यावर विश्वास नसतो त्यामुळे तो प्रियाला ओरडतो.

पण घरातल्या इतर सर्वांचा प्रियावर खूप विश्वास असल्यामुळे ते सायलीवर भडकतात. अस्मिता सायली बद्दल खूप काही बोलत असते. सायली घरातून पैसे घेऊन पळून गेली ती आता आपल्या पैशांवर मजा मारत असेल असं म्हणते. अर्जुनला मात्र अस्मिताच्या बोलण्याचा खूप राग येतो आणि तो तिच्यावर हात उचलायला जातो. सुभेदारांच्या घरात सायली विरोधात आरोप प्रत्यारोपांचे खेळ चालू असतात तितक्यात कल्पना चा फोनवर सायलीच्या नावाने मेसेज येतो की आई मला त्या घरात खूप कंटाळा आला आहे. मला आता सहन होत नाही त्यामुळे मी घर सोडून कायमची निघून जात आहे. अर्जुन ला फार मोठा धक्का बसतो. पण तरीही त्याचा सायलीवर विश्वास कायम असतो. आता मालिकेच्या येत्या भागात आता अस्मिता आणि प्रियाचा डाव त्यांच्यावरच उलटणार का हे पाहणं औस्तुकत्तेचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून तिढा कायम, काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

‘मधुबाला’चा बायोपिक लवकरच  रुपेरी पडद्यावर,कोण साकारणार भूमिका ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss