काही दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार(Vijay wadettiwar) यांनी ” उज्वल निकम हा बेईमान माणुस आहे. वकिल नसुन देशद्रोही आहे” असा त्यांच्यावर आरोप केले. तर शहिद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही कसाबच्या बंदुकीतील गोळी नव्हती तर ती आर.एस.एस समर्पित पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीची गोळी होती असे ही ते म्हणाले.त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “त्या कसाब बद्दल प्रेम व्यक्त करणं म्हणजे देशद्रोह आहे.”असं म्हणत विरोधकांवर टीका केली आहे.
६ मे रोजी “टाईम महाराष्ट्र” या वेबपोर्टलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath shinde) यांनी विशेष मुलाखत दिली. त्यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीचे उमेदवार उज्वल निकम यांच्यावर आरोप करत टीका केली होती त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता, “अजमल कसाब हा पाकिस्तानातून आला. त्याने मुंबईच्या निष्पाप लोकांना मारलं. त्या कसाब बद्दल प्रेम व्यक्त करणं म्हणजे देशद्रोह आहे. जे पोलिस शहिद झाले त्यांचा अपमान आहे आणि त्यांच्या परिवाराचा अपमान आहे. शहिद झालेल्यांचा हा अपमान आहे.”असं वक्तव्य टाईम महाराष्ट्र ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले की, “मला वाटतं की, कॉंग्रेसचा हात पाकिस्तान के साथ असं म्हणण्याची पाळी आली आहे. पाकिस्तानवर अभिमान वाटत आहे. या देशात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणारे या देशामध्ये पाकिस्तान विरुद्ध भारत असा सामना झाल्यावर पाकिस्तानात फटाके फोडणारे राहत आहेत.” अशा शब्दात विरोधकांवर घणाघाती टीका केली.
हे ही वाचा:
जेव्हा आनंद दिघेंनी राज ठाकरेंच नाव…. CM Eknath shinde यांचा गौप्यस्फोट
Follow Us