महाराष्ट्र आज सुद्धा गुंतवणूक करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु, राज्यातले उद्योग यांनी बाहेर काढले, नाणार प्रकल्पाला, नवीन विमानतळाला विरोध करणारे पण हेच. राज्याचा जीव उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतला आहे. अशी टीका करत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे.
आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्यासंबंधी टीका केली आहे. असे घोटाळे करून आमचा पक्ष चालत नाही किंवा कोविड खिचडी घोटाळा करून आमचा पक्ष चालत नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीचा आमच्या पक्षाच्या खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाला देत असतो.
हे ही वाचा:
जत तालुक्यातील ६५ गावांना सिंचनाचा लाभ मिळणार
सुप्रीम कोर्ट करणार नबाम रेबिया खटल्याचा पुनर्विचार