मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर करण्याचा डाव होता, असे गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहेत. उद्धव ठाकरे यांचे हात खेचले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जिवंत नसते, असा खळबळजनक आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला.
संजय गायकवाड म्हणाले की, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राऊत म्हणाले, उद्धवसाहेब देत होते, शिंदेंनी त्यांचे हातच घेतले. त्याला मी उत्तर दिलं की, जर आम्ही उद्धव ठाकरे यांचे हात घेतले नसते, तर आज कदाचित एकनाथ शिंदे आज जिवंत दिसले नसते.
गडचिरोलीला एकनाथ शिंदे जेव्हा पालकमंत्री होते, तेव्हा त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कडक भूमिका घेतली होती. त्यामुळे नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी दिली होती. संजय गायकडवाड पुढे म्हणाले की, शिंदेंच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून, राज्य सरकारने शंभूराज देसाई तत्कालीन गृह राज्यमंत्र्यांच्या घरी बैठक बोलवली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा प्रयत्न झाला. तितक्यात उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन शंभूराज देसाईंना फोन करुन शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका असं सांगितलं. म्हणजे एकप्रकारे त्यांना पक्षातून आणि जीवनातून संपवण्याचा कट होता. त्यामुळे राऊत म्हणाले की, देता देता आमचे हात घेतले, तर आम्ही त्यांचे हात घेतले नसते तर तुम्ही आमच्या एकनाथ शिंदेंचा बळी घेतला असता.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे आणि ड्रग्स माफिया ललित पाटील यांचे फोटो व्हायरल
पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य, काय आहे नवी नियमावली?