Saturday, May 18, 2024

Latest Posts

“दीड महिन्यांपूर्वी आम्ही ५० थरांची हंडी फोडली” – एकनाथ शिंदे

संपूर्ण राज्यात आज दहिहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ठाण्यातील टेंभीनाका येथील दहिहंडी उत्सावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठाण्यातही मानाच्या दहीहंडी उत्सावाला सुरुवात झाली आहे.

संपूर्ण राज्यात आज दहिहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ठाण्यातील टेंभीनाका येथील दहिहंडी उत्सावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठाण्यातही मानाच्या दहीहंडी उत्सावाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसेनेची दहीहंडी मोठी प्रतिष्ठेची मानली जाते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी अनेक जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दहीहंडीसाठी टेंभीनाका येथे मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. या दहीहंडीला अभिनेत्री श्रद्धा कपूरची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, या दहीहंडी उत्सवाला येताना मला विशेष आनंद होतो की, दिघे साहेबांचं स्वप्न होतं की एक दिवस ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि आता ते प्रत्यक्षात आलं आहे. काय त्या माणसाची दूरदृष्टी असेल काय त्यांचे विचार असतील. मला आनंद होतोय की या दहीहंडी उत्सावला मला उपस्थत राहता आलं यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आम्ही दीड महिन्यापूर्वी सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली. बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही ही हंडी फोडली. यामध्ये आम्ही पन्नास थर लावले.

देशभरात गोपाळकालाचा उत्साह पाहायला मिळत आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा करत सरकारी नोकऱ्यांमध्ये गोविंदांना पाच टक्के आरक्षणाचा लाभ देण्याची घोषणा केल्यानंतर सरकारनं आता पुन्हा एक महत्वाची घोषणा केली आहे. दहीहंडी कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. या सरकारमधून सर्वांना न्याय देण्याचं काम केरणार आहे. त्यामुळं सर्वांना सांगू इच्छितो की जल्लोषात आणि काळजी घेऊन उत्सव साजरे करा. कोराना अजून संपलेला नाही. त्यामुळं संशय आला, किंवा लक्षणं वाटली तर आपली तपासणी करुन घ्या. कोविड, स्वाईन फ्लू आणि डेंग्यू याचा देखील फैलाव होतोय त्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे. मर्यादा वैगेरे बस झाले दोन अडीच वर्षे आपण हे पाळलं. त्यामुळं आपण गणेशोत्सावातील नियम-अटी शिथील केल्या, सर्व परवानग्यांचे पैसे माफ केले. राज्यात सर्वांच्या जीवनात चांगलं जीवन आणण्याचा प्रयत्न हे सरकार करणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, सरकार हे तुमच्या सर्वांचं आहे, शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, कामगारांच आणि गोविंदाच देखील. गोविंदाच्या या सणाला आपण सार्वजनिक सुटी देऊन टाकली आहे. तसेच दुसरीकडे गोविंदांना दुर्देवानं काही झालं तर १० लाखांचं विमाकवचही घोषीत केलं आहे. तसेच प्रो कबड्डी प्रमाणं आता प्रो गोविंदा पुढच्या वर्षापासून सुरु होईल. तसेच क्रीडामध्ये ५ टक्के आरक्षणही लागू होईल.

हे ही वाचा :-

जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर पॅनोरमा म्युझिकने रिलीज केले “राधे कृष्ण” हे नवे गाणे

ठाणे टेंभी नाक्यावर शिंदे गटाची दहीहंडी, मुख्यमंत्र्याची प्रमुख उपस्थिती

Latest Posts

Don't Miss