Ashish Shelar on vajramuth sabha : आज मुंबईत वांद्रे येथील बीकेसी (BKC) ग्राउंडवर महाविकास आघाडीची भव्य वज्रमूठ सभा पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू असून आतापर्यंत अनेक प्रमुख नेत्यांनी सभेच्या तयारीचा आढावाही घेतला आहे. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आजच्या सभेत काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेच्या मालिकेतील दोन सभा संपन्न झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhaji nagar) आणि नागपूरनंतर (Nagpur) तिसरी जाहीर सभा महाराष्ट्रदिनी ठाकरेंच्या होम ग्राउंडवर मुंबईत पार पडत आहे. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात हि तिसरी ‘वज्रमूठ’ सभा असल्याने ठाकरे गटाने ही सभा यशस्वी करण्याकरिता जय्यत तयारी केली आहे.
वज्रमूठ सभेवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. हि वज्रमूठ सभा ऐतिहासीक होणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. त्या सभेची तयारी, आमचा जोष पाहायला देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. आमची नागपूरला सभा होती त्यावेळी पण गृहमंत्री खारघरला आले होते असेही राऊत म्हणाले होते. संजय राऊतांच्या या दाव्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी संजय राऊतांवर टीका केली.
संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजप मुंबईचे अध्यक्ष महाविकास आघाडीच्या सभेवर आता भाजपचे नेते अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीका केली आहे. मुठभर मैदान, मुठभर संख्या आवाज मात्र मोठा. मैदान छोटे, आकडे खोटे आणि या ठिकाणाचे संजय राऊत यांचे भोंगे मोठे असं म्हणत आशिष शेलारांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. सोबतच उद्धव ठाकरेंवर देखील आशिष शेलारांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची प्रगती झाली असून शिवाजी पार्कातून ठाकरे बीकेसीच्या छोट्या मैदानावर आले असल्याचे शेलार म्हणाले आहेत.
हे ही वाचा :
आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा द्या तुमच्या मित्रपरिवाराला