Saturday, July 27, 2024

Latest Posts

ED चौकशीची भीती? झारखंडचे मुख्यमंत्री १८ तासांपासून बेपत्ता

सध्या सगळीकडे ED संदर्भात अनेक चर्चा या सुरु आहेत. अमलबजावणी संचालनालयकडून सध्या देशात विविध राजकीय नेते आणि काही उद्योगपतींची चौकशी सुरु आहे. मनी

सध्या सगळीकडे ED संदर्भात अनेक चर्चा या सुरु आहेत. अमलबजावणी संचालनालयकडून सध्या देशात विविध राजकीय नेते आणि काही उद्योगपतींची चौकशी सुरु आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरण, आर्थिक अनियमितता यामुळे ईडीच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. महाराष्ट्रात अनेक नेत्यांची चौकशी सुरु आहे. तर आता ईडी चौकशी झारखंडमधील मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचली आहे.

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सोमवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी पोहोचले. यावेळी हेमंत सोरेन निवासस्थानी उपस्थित नव्हते. ईडीच्या पथकाने १३ तासांहून अधिक काळ तेथे तळ ठोकला. यावेळी निवासाचीही झडती घेण्यात आली. तपास यंत्रणेने सोरेनच्या निवासस्थानातून हरियाणाची नोंदणी असलेली बीएमडब्ल्यू (BMW) कार जप्त केली असून निवासस्थानाच्या झडतीदरम्यान सापडलेली काही कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. तर सीएम हेमंत सोरेन अटकेच्या भीतीने गेल्या १८ तासांपासून फरार आहेत.

सोमवारी दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी दिल्ली पोलिसांसह ईडीची टीम ९ वाजता दक्षिण दिल्लीतील ५/१ शांती निकेतन भवनात पोहोचली. रात्री १०.३० वाजेपर्यंत ईडीचे पथक तेथे उपस्थित होते. रात्री १०.३० च्या सुमारास ईडीचे अधिकारी हा परिसर सोडताना दिसले. तपास यंत्रणेने हेमंत सोरेन यांच्या घरातून एक बीएमडब्ल्यू आणि काही कागदपत्रे जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच यावेळी पीटीआयशी बोलताना सोरेन कुटुंबातील एका सदस्याने ही संपूर्ण घटना हेमंत सोरेन यांना बदनाम करण्याचा कट असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, सोरेन यांनी सातत्याने ईडीला उत्तर दिले आहे. ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता त्यांच्या निवासस्थानी जबाब नोंदवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती.

२७ जानेवारीला सोरेन रांचीहून दिल्लीला रवाना झाले. त्यांचा पक्ष जेएमएमने सोमवारी सांगितले की ते वैयक्तिक कामासाठी गेले होते आणि परत येतील. तथापि, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) झारखंड युनिटने सोमवारी दावा केला की राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईच्या भीतीने गेल्या १८ तासांपासून फरार आहेत आणि त्यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे. ते घेण्यासाठी ते म्हणाले की, झारखंडची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हे ही वाचा:

‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला मुनव्वर फारुकी,खास पोस्ट केली शेअर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss