भारतीय रिझर्व्ह बँक देशभरातील कोट्यवधी कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच बैठकीत पतधोरण समितीने नागरिकांवरील कर्जाचा हप्ता न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयी घोषणा केली. गेल्या वर्षभरापासून आरबीआयने रेपो दराबाबत नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. केंद्रीय बँकेने २०२३ एप्रिलपासून रेपो दर कायम ठेवला आहे. त्यात कोणतीही वाढ केली नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दरात शेवटची वाढ करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात रेपो दर न वाढल्याने कर्जावरील हप्ता जैसे थे आहे. मात्र ग्राहक रेपो दरात कपातीची अपेक्षा करत आहेत. रेपो दर जैसे थे ठेवल्याने त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून येईल. Time Maharashtra is one of the India’s upcoming Media & Entertainment News.
हे ही वाचा:
Food Poisoning नंतर आरोग्य विभागाद्वारे शीघ्र कृती पथकाची स्थापना
छगन भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी: मनोज जरांगेंची मागणी
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.