सर्वांची लाडकी मालिका ‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही शोला तब्बल १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या मालिकेने संपूर्ण इंडस्ट्रीला दोन दिग्गज कलाकार दिले. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) यांनी या मालिकेद्वारे सर्व लोकांच्या मनावर राज्य केले. आज या कार्यक्रमाला १४ वर्ष पूर्ण झाल्याच्या आठवणीत अंकिता लोखंडेने या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. परंतु तिच्या या पोस्टवर नेटकरी चांगलेच संतापले देखील आहेत.
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने आज पवित्र रिश्ता या मालिकेला १४ वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात सोशल मीडियावर एक पोस शेअर केली आहे. तसेच तिच्या या पोस्टवर अनेक कंमेंट्स देखील येत आहेत. या कंमेंट्समार्फत नेटकऱ्यांनी अंकितावर संताप देखील व्यक्त केला आहे. याच मुख्य कारण म्हणजे अंकिताने जी पोस्ट केली आहे त्यामध्ये अभिनेता सुशांतचा कुठेही उल्लेख केलेला नाही. अंकिताने शोला १४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लिहिले आहे की, ‘पवित्र रिश्ताने १४ वर्षे पूर्ण केली आहेत आणि अजूनही फ्रेश आणि कनेक्टेड वाटत आहे. आभारी आहे देवा. मी अर्चना बनू शकते असा माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल एकता कपूरचे आभार. अर्चना म्हणून मला नवीन ओळख दिल्याबद्दल धन्यवाद. मला अजूनही लोक अर्चना नावानेच आठवतात. मी खूप कृतज्ञ आहे. यासोबतच त्याने अर्चनाच्या पात्राचे फोटोही शेअर केले आहेत.
अंकिताने केलेल्या या पोस्टवर चाहत्यांना राग येत आहे. अंकिताने पोस्टमध्ये सुशांतचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे चाहत्यांनी लिहिले आहे की, सुशांतचा उल्लेखही केला नाही. सुशांतचा एकही फोटो शेअर केला नाही. अंकिता मॅडमला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. या शोला सुशांत सरांच्या अभिनयालाही तितकेच प्रेम दिले गेले. तर दुसऱ्या व्यक्तीने कंमेंट मध्ये लिहिले आहे की, मला समजत नाही की तुम्ही या लोकांकडून कशा अपेक्षा करत आहात. चाहत्यांकडून अशाच अनेक कमेंट्स केल्या जात आहेत. अंकिताची पोस्ट मिस यू सुशांतच्या कमेंट्सने भरलेली आहे.
हे ही वाचा:
खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates
Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’
संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा