Monday, May 13, 2024

Latest Posts

Uddhav Thackeray Live: कोकण हे शिवसेनेचे हृदय, गद्दारांचे दोन मालक दिल्लीत…

लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करण्यासाठी रत्नागिरीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील या सभेला अनेक मान्यवरांनी संबोधित केले. उद्धव ठाकरे यांचा सभेत प्रवेश होताच शिवसेनेचे गाणे लावून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर विनायक राऊत यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेला उद्धव ठाकरे यांनी संबोधित करत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, कोकण हे शिवसेनेचे आणि ठाकरे कुटूंबाचे हृदय त्यामुळे कोकणात प्रचार करण्याची गरज नाही. शिवसेना फोडली, चोरली, गद्दारांना धनुष्यबाण दिले आणि उमेदवार बदलले आणि आता कोकणातून धनुष्यबाण गायब केले. जांभा दगडाचा लाव्हा होतो, कोकणात हा दगड आहे, तर आता कोकणात लाव्हा व्हायला वेळ लागणार नाही. मोदी किती काही बोलतील पण आता मोंदींचा आत्मविश्वास पाहायला मिळत नाही. मोदींच्या छातीतील हवा पण गेली आता.

महाराष्ट्राचे दैवत तुम्ही नाकारताय, महाराष्ट्राचा तुम्हाला आकस आलाय, तुम्ही जेव्हा जय श्रीरामाचा नारा देता, तेव्हा आमचा विरोध नसतो. आम्ही सुद्धा श्रीरामाला मानतो. मग तुम्हाला ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा आकस का वाटतोय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला केला. गुजरातच्या भूमीत औरंगजेब जन्मला आहे,  मोदींना मत म्हणजे विनाशाला मत असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. ज्याप्रकारे ईडी आणि सीबीआयचा गैरवापर केला जातोय, तसंच नंतर आमचं सरकार आल्यावर तुमच्याही घरात आम्ही घुसू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला दिला.

‘एक अकेला सबपे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी’ असे म्हणत २०१४ ला आपण भाजपसोबत जाऊन फसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जर मला संपवायचं आहे, तर मैदानात उतरा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत मोदी सरकारला दिले. कोरोनाच्या काळात तुम्ही मला साथ दिली. त्यामुळे मी सर्व करू शकलो. त्यामुळेच मी महाराष्ट्रातील नंबर १ मुख्यमंत्री ठरलो.

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांची भाषा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’, Nana Patole यांचा घणाघात

“Amit Shah आणि Yogi यांनी कोकणात येऊ नये”; भास्कर जाधवांचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss