शिवसेनेत फूट पडल्यानंतर सेनेतील नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाले. संजय राऊत(Sanjay raut) हे शिवेसेनेतील छत्रपती संभाजीनगर मधील आमदार संजय शिरसाट(Sanjay shirsat) यांच्या कायमच रडारवर असतात. परंतु आज त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर घणाघाती टीका करत काही गौप्यस्फोट केले. “संजय राऊत यांना मनोरुग्णालयात पाठवावे”असे म्हणत संजय राऊतांवर टीका करण्यास सुरुवात केली.
आज छत्रपतीसंभाजीनगर येथे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट(Sanjay shirsat) यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. तेव्हा “संजय राऊत राज्यात गुंडगिरी आहे असं म्हणतात पण हाच गुंड निवडणुकीनंतर लवकरच जेल मध्ये जाणार आहे,निवडणूकी नंतर काय होते ते लक्षात ठेवा”अशा शब्दात संजय राऊतांना इशारा दिला आहे. ‘शिवसेना फडणवीस गट तुम्ही कुणाला काय नाव द्यायचे ठरवून घ्या. आम्हाला नाव ठेवायची कुणाची ताकत नाही. जमलं तर आम्ही दुकान बंद करू पण लाचारी स्वीकारणार नाही.”असं ही ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CMEknathshinde) यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडाबाबत गौप्यस्फोट करत म्हणाले की, “अजित पवार(Ajit pawar) यांना आमच्या बंडाची कल्पना होती.त्यांनी ती उद्धव ठाकरेंना सांगितली होती मात्र त्यांच्या चमच्यांनी त्यांची दिशाभुल केली, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी(Uddhavthackeray) लक्ष दिले नाही.बाकी कुणी क्रेडिट घ्यावे यासाठी उठाव नव्हता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी केलेली धावपळ आपण पाहिली.”असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली.
दरम्यान, “अमित शाह(Amit Shah) म्हणतात ते सत्य आहे. नारायण राणे(Narayan Rane) बाळासाहेबांचे कवच म्हणून काम करायचे आजही राणे बाळासाहेबांबाबत एक शब्दही बोलत नाही”असं अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत म्हणाले. तर “प्रकाश आंबेडकर काही दिवसांनी आमची स्तुती करतील.”असं ते यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
Rohit Vemula प्रकरणामुळे Prakash Ambedkar यांचे Congress वर ताशेरे
Follow Us