आज सकाळी (शुक्रवार, १० मे) झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. औरंगजेबाचा जन्मही गुजरातमध्ये झाला आहे अशी टीका देखील त्यांनी केली. यानंतर त्यांच्या या वक्तव्याची सगळीकडे एकच चर्चा चालू आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, “भाजपला औरंगजेबावर एवढं प्रेम का आलं आहे? एवढं प्रेम का आहे औरंगजेबावर ?औरंगजेब एक शासक होता आणि त्याने महाराष्ट्रावर वारंवार हल्ले केले त्याचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे हे जर चुकीचे असेल तर भाजपने आम्हाला इतिहास सांगितला पाहिजे कि औरंगजेबचा जन्म कुठे झाला होता. जसा आम्ही गर्वाने म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर,बाळासाहेब ठाकरे यासारख्या महान योद्धांचा जन्म महाराष्ट्रात झाला, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या महान नेत्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला.”
ते पुढे म्हणाले, “औरंगजेबाचा जन्मही गुजरातमध्ये झाला तर मी काय चुकीचा बोललो, ज्या मातीत औरंगजेबचा जन्म झाला त्या मातीचे काही गुणधर्म राज्यकर्त्यांना लागले असतील. मोदी आणि शाह त्याचप्रमाणे महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत, महाराष्ट्र तोडण्याचा, महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्यात कोणाला मिरची लागण्याची काय गरज आहे. मी कोणाला औरंगजेब नाही म्हटलं ही एक विकृती आहे. जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू व्यक्तिगत नाही, हा इतिहास आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून, ही भाषा आम्ही बोलतो. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत आम्ही गाडलेलं आहे. त्यांना एवढ्या मिरच्या झोंबायचं कारण काय, मोदींच्या बाजूला लावा औरंगजेबाचे फोटो, तुम्ही त्याच वृत्तीचे लोक आहात, क्रूर, सूडबुद्धीने वागणारे लोकं आहात.”
मागे झालेल्या प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांवर टीका करताना त्यांना ‘नकली संतान’ असे म्हणले होते यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब ठाकरे यांच्या बद्दल, यांच्या बाबतीतला अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केलेल आहे. अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती, या दोन्ही व्यक्तिमत्त्वांना महाराष्ट्र पुजतो त्यांना तुम्ही नकली म्हणता ही तुमची हिंमत आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात, तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात, तेलंगणात जाऊन महाराष्ट्राबद्दल अशा प्रकारची भाषा करणे हे बरोबर नाही.”
आज शिवाजी पार्कवरती नरेंद्र मोदी यांची राज ठाकरेंसोबत सभा होणार आहे. गुढीपाडव्यादिवशी शिवाजी पार्कवरती झालेल्या मेळाव्या मध्ये राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते, याबद्दल संजय राऊत म्हणाले, “यालाच तर सुडाच राजकारण म्हणतात, सत्तेचा गैरवापर म्हणतात, लफंगेगिरी आणि भय म्हणतात. महाराष्ट्रात आणि मुंबईत आम्ही कुठेही सभा घेतली तरी आमच्या सभेला लोकं येतील भाड्याने आम्हाला लोकं आणावी लागत नाही. तुम्ही त्यांचा जुना टिजर दाखवा, मोदी आणि शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देऊ नका हे कोण म्हणालं होत ? आता हे वाघ एकत्र येत आहेत ते लांडगे आहेत.”
हे ही वाचा:
“मुंबई लोकल” चित्रपटाचे सिद्धिविनायक चरणी पोस्टर लॉन्च
Follow Us