Friday, May 17, 2024

Latest Posts

Devendra Fadnavis मटण खाणारे ब्राम्हण, त्यांचा शाप लागणार नाही; Nana Patole यांची टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आज जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी ‘देवेंद्र फडणवीस यांचा शाप लागणार नाही कारण ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत,’ असे वक्तव्य केले, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, “पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) सोलापूरच्या प्रश्नांना हात घातला नाही. किंबहुना मागील वेळी दिलेल्या आश्वासनाबद्दल त्यांनी शब्दही काढला नाही. धर्माच्या आधारावर सुरू असलेली मोदींचे भाषण ऐकायला लोकांना कंटाळले आहेत. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी लोकांना पैसे देऊन आणावे लागतात तर राहुल गांधींचा सभेला लोक उन्हात उभा राहायला तयार आहे. या निवडणुका देशाच्या आहेत धर्माच्या नाहीत. आता सोलापुरात कोणतेही नेते आले तरी मोदीचे सरकार येणार नाही. गृहखाते फडणवीसांकडे आहे त्यांना महाराष्ट्रातील चित्र कळले आहे. बुथवर जेवढे मतदान झाले त्यावर दोन-तीन टक्के मतदान वाढवत आहेत. निवडणूक आयोगाने 70C प्रमाणे आकडे असावेत त्यानी ती चूक करू नये अशी आमची भूमिका आहे.”

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “”देवेंद्र फडणवीस यांचा शाप लागणार नाही कारण ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत. शाप देण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे हे आम्ही पोथी पुराणात वाचले आहे. मात्र हे ब्राह्मण मटण खाणारे आहेत. यांच्या शाप लागत नाही हे त्यांना देखील माहिती आहे. फडणवीस आणि आम्ही सोबत मटण खाल्ले आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत नाना पटोले म्हणाले, “डॉक्टर मनमोहन सिंह यांना मोदी मौनी बाबा म्हणायचे. इंडिया आघाडीचे सरकार देशात येईल आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील. नोटाबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. कर्नाटकचा प्रज्वल असो किंवा देशभरातले भ्रष्टाचारी हीच भाजपची ओळख आहे.”

हे ही वाचा:

संविधान वाचवण्यासाठी आमची ही लढाई आहे – Amol Kirtikar

त्यांच्या कार्यअहवालात अजित दादांचं काम दिसतं, Chitra Wagh यांचा Supriya Sule यांच्यावर घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss