बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. या घटनेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ज्या बेईमान लोकांनी काल स्मृतीस्थळावर नौटंकी केली, त्यांना शिवसैनिक कसं म्हणायचं? असे म्हणत संजय संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली. गद्दारांना प्रतिकार हा केवळ ट्रेलर, २०२४ ला पिक्चर दाखवणार, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे हे देशातल्या समाजकारणातील महान व्यक्तिमत्व होते. त्यांनी शिवसेनेची स्थापना केली नसती तर मुंबई (Mumbai) आणि मराठी माणूस स्वाभिमानाने ताठ मान करून असलेला माणूस आपल्याला दिसला नसता. त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र अखंड ठेवला आहे. आमच्यासारखे असंख्य लोक जे समाजकारणामध्ये सक्रीय आहेत, ते त्यांच्यामुळेच आहेत. आम्ही दिल्लीत गेलो, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले ते फक्त बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेमुळे आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर बेईमान गटाच्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. नौटंकी केली त्यांना शिवसैनिक कसं म्हणता येईल? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना, त्यांच्या भूमिकेला तिलांजली दिली, ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला तो शिवसैनिक कसला? संत तुकडोजी महाराजांचं एक अभंग आहे. ‘मनी नाही भाव देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही’. तुमच्या मनात श्रद्धा नाही भाव नाही आणि तुम्ही स्मृती स्थळावर येऊन नौटंकी करत आहे. बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे आहेत. स्मृतीस्थळावर सगळ्यांनी यायला हवं, पण काल स्मृतीस्थळावर ज्यांनी नौटंकी केली त्यांना आम्ही शिवसैनिक कधीच मानणार नाही. त्यांच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंविषयी अजिबात श्रद्धा नाही. अशी आक्रमक भूमिका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.
हे ही वाचा :
अंकिता लोखंडे देणार गुडन्युज,बिग बॉसच्या घरात केली प्रेग्नेंसी टेस्ट
Balasaheb Thackeray: हे नातं जगात सगळ्यात ‘स्पेशल’ असतं..आदित्य ठाकरेंची पोस्ट चर्चेत