त्र्यंबकेश्वरमधील घटनेवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, काहीही चुकीचं घडलेलं नाही…

सध्या २-३ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwer) वातावरण हे तापलेले दिसून येत आहे.

त्र्यंबकेश्वरमधील घटनेवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, काहीही चुकीचं घडलेलं नाही…

सध्या २-३ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwer) वातावरण हे तापलेले दिसून येत आहे. यामुळे राजकीय वातावरणात देखील खळबळ ही उडाली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर होते. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer Mandir) येथील घटनेवर प्रतिक्रिया दिली.

आज सकाळी संजय राऊत म्हणाले आहेत की, महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडविण्याचा हा प्रयत्न आहे. नकली हिंदुत्वाच्या नावावर काही टोळ्या निर्माण करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न. मला काही कट दिसत आहे, आमचे हिंदुत्व कडवट, नकली हिंदुत्व नाही. आमच्यासाठी त्र्यंबकेश्वर श्रद्धास्थान, माझ्या माहिती प्रमाणे तिथे कुणी घुसलं नाही. तसेच ते पुढं म्हणाले, त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwer) काहीही चुकीचं घडलेलं नाही. उरुसचं धूप देवांना दाखविण्याची प्रथा आहे. त्यांनी मंदिराच्या गेटवर जाऊन देवांना धूप दाखविले. सदर घटनेची माहिती घेतली असून कुणीही मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला नसल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

मुस्लिम लोक संदल च्या दरम्यान तिथं पायरीवर धूप दाखवतात, आरती करतात. मुस्लिम दर्ग्यावर हिंदू लोकही जातात, हाजी अली, अजमेर अशा ठिकाणी हिंदू लोक जातात. रामनवमीला कधी दंगल झाली नव्हती, सरकारच्या पायाखालची जमीन हादरली. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखला पाहिजे, पण सत्ताधारी सामाजिक सलोखा बिघडवत आहे असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या नावाने टोळ्या निर्माण करायच्या आणि वातावरण दूषित करायचे असा कट मला दिसतो असल्याचे सूचक वक्तव्य यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.

बजरंग बलीची गदा मोदींनी फिरवली पण ती त्यांच्याच डोक्यात पडली. हिंदुत्व आमचा व्यवसाय नाही, राजकीय भांडवल नाही, श्रद्धा आहे. देशद्रोही कोण हे स्पष्ट दिसत आहे, आरएसएस चा प्रचारक प्रमुख पाकिस्तानच्या हनीट्रॅप मध्ये अडकला. कुरुलकर प्रकरण हे सर्व भाजप च्या संबंधी, तिथं एसआयटी ची स्थापना करा आणि चौकशी करा इथं काय एसआयटी स्थापना करत आहात. त्यांच्यावरील दुर्लक्ष करण्यासाठी त्र्यंबकेश्वर आणि शेवगाव सारख्या दंगली घडविल्या जात आहेत. मुस्लिमांवर अत्याचार करणे ही आमची परंपरा नाही. जे पी नड्डा जिथे जातात तिथे त्यांचा पराभव होतो. राहुल नार्वेकर म्हणून नोटीसा देत आहेत, अध्यक्ष म्हणून देत नाही. भगत सिंह कोश्यारी प्रमाणे नार्वेकर वागत आहे. प्रेस घेऊन बोलत नाही, नार्वेकर प्रेस समोर बोलत आहे , त्यांना बडतर्फ केले पाहिजे. मान कापली जाईल पण शिवसेना सोडणार नाही असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

Exit mobile version